शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्यमंत्री योगींनी दया दाखवली, चिमुकलीच्या वडिलांची सुटका अन् दिवाळी गिफ्टही दिलं

By महेश गलांडे | Updated: November 14, 2020 14:39 IST

बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर सोडण्यात आले.

ठळक मुद्देबुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर सोडण्यात आले.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील फटाके विक्रेत्याच्या मुलाचा आवाज अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचला. मुलीच्या विनवणी आणि विनंतीवरुन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फटाके विक्रेत्याची सुटका झाली. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलीचे घर गाठून तिला व तिच्या वडिलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, मिठाईही खाऊ घातली. 

बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर सोडण्यात आले. भाजपा नेते शलभ मनी त्रिपाठी यांनी यासंदर्भातील ट्विट करुन माहिती दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत केवळ फटाके विक्रेत्याची सुटकाच केली नाही, तर फटाके विक्रेत्याच्या घरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिठाई घेऊन पाठवले. या अधिकाऱ्यांनी पीडित वडिलांच्या चिमुकल्या मुलीला स्वत:च्या हाताने मिठाई भरवली. तसेच, दिवाळीचे गिफ्टही देण्यात आले. तसेच, संबंधित दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथील ही घटना आहे. एनजीटीच्या आदेशानुसार शुक्रवारी 6 फटाके विक्रेत्यांना पोलिसांनी खुलेपणाने फटाके विकत असल्यामुळे अटक केली होती. त्यासोबतच सर्व दुकानदारांचे फटाकेही जप्त करण्यात आले होते. त्यावेळी, काही दुकानदारांनी पोलिसांसोबत धक्काबुक्कीही केली. दरम्यान, एका दुकानदारास पोलीस ठाण्यात नेत असताना, त्या फटाके विक्रेत्याच्या मुलीने रडायला सुरुवात केली. तसेच, माझ्या वडिलांना सोडून द्या, अशी विनवणीही पोलिसांसमोर केली, हात जोडले डोकंही टेकलं. मात्र, पोलिसांनी त्या मुलीच्या विनवणीला न जुमानता फटाके विक्रेत्यास पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच, माध्यमांमध्येही झळकला होता. त्यानंतर, खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मुलीच्या वडिलांना सोडून देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, मुलीच्या वडिलांची सुटका करण्यात आली. 

याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी त्रिपाठी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, संवेदनशीलतेनं काम करण्याचं सूचवलं आहे. त्यामुळे, रात्रीच सर्व फटाका विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे बजावल्याचे त्रिपाठी यांनी म्हटलं.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDiwaliदिवाळी