शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:28 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान अजब विधान केले आहे. या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणून ओळखला जातो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देहिंदू शब्दाचा एवढा राग का? - योगी आदित्यनाथराम मंदिर संपूर्ण देशाचा गौरव - योगी आदित्यनाथकेरळ हे सनातनाचे आस्था केंद्र - योगी आदित्यनाथ

प्रयागराज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान अजब विधान केले आहे. या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणून ओळखला जातो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (yogi adityanath claims if a citizen of india goes to haj it is also identified as hindu)

अखंड भारतातील कोणताही नागरिक जेव्हा हज किंवा अन्य कारणांसाठी परदेशात जातो. तेव्हा त्याला हिंदू म्हणूनच ओळखले जाते, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हिंदू हा धर्म नाही. हिंदू एक जीवन पद्धती आहे. ती एक संस्कृती आहे. सनातन हा धर्म आहे. आम्हाला आमच्या हिंदू म्हणून असलेल्या ओळखीबाबत अभिमान वाटतो, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

हिंदू शब्दाचा एवढा राग का?

हिंदूला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करणारे लोक अयोध्या, मथुरा, काशी यांचा आदर करत नाहीत. हिंदू शब्दाचा एवढा राग कशासाठी केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत हिंदू म्हणजे कोणताही एक धर्म नाही. सनातन हा धर्म आहे, असे योगी म्हणाले. 

राम मंदिर संपूर्ण देशाचा गौरव

अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी करण्यात आली असून, हा संपूर्ण देशाचा गौरव आहे. संपूर्ण जगाने श्रीरामांना स्वीकारले आहे. मात्र, आपल्याच देशातील काही जण श्रीरामांचा  द्वेष करतात. रामायण काळात राक्षसही असेच करत होते, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना लगावला. 

केरळ हे सनातनाचे आस्था केंद्र

आदि शंकराचार्यांचा जन्म केरळमध्ये झाला होता. केरळला आम्ही सनातन आस्था केंद्र मानतो. आदि शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना करत सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला आहे, असे सांगत केरळमध्ये काँग्रेस फाळणीचे राजकारण करत आहे. काँग्रेसच्या याच विचारसरणीमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. फाळणीची मानसिकता चिंता वाढवणारी आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूHaj yatraहज यात्रा