शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

भारत-नेपाळमधील कटुता दूर करण्यात योगी बजावू शकतात महत्त्वाची भूमिका, हे आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:31 IST

भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते

ठळक मुद्देगोरखनाथ मंदिर आणि सर्वसामान्य लोकांमधील चांगल्या संबंधांच्या मदतीने दोन्ही देशातील संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकतेनाथ संप्रदायाचे केंद्र असलेले गोरखपूर येथील गोरक्षपीठ आणि गोरक्षपीठाधीश्वर यांना नेपाळमधील जनमानसात श्रद्धेचे स्थान आहेनेपाळच्या मुद्रेवर गोरखनाथ आणि नाथपंथाशी संबंधित प्रतीके मुद्रित केली जातात. त्यांचा तेथील जनमानसावर मोठा प्रभाव आहे

 गोरखपूर - एकीकडे सीमेवर चीनकडून घुसखोरी सुरू असतानाच दुसरीकडे नेपाळनेही सीमाप्रश्नवरून कुरापतखोरी करून भारताची चिंता वाढवली आहे. चीनच्या इशाऱ्यावर चालत असलेल्या नेपाळने दोन्ही देशांमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेला रोटीबेटी व्यवहारही मोडीत काढण्याइतपत मजल मारली आहे. मात्र दोन्ही देशांमधील संबंधामध्ये आलेली कटुता आणि वैरत्व मिटवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा आहे.

गोरखनाथ मंदिर आणि सर्वसामान्य लोकांमधील चांगल्या संबंधांच्या मदतीने दोन्ही देशातील संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे नाथ संप्रदायाचे केंद्र असलेले गोरखपूर येथील गोरक्षपीठ आणि गोरक्षपीठाधीश्वर यांना नेपाळमधील जनमानसात श्रद्धेचे स्थान आहे.   

 सध्याचे गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी नेपाळला आपल्या राजकीय सीमांची आखणी करताना तिबेटची काय अवस्था झाली, ते विचारात घ्यावे असा सल्ला दिल्ला होता. मात्र योगींच्या या सल्ल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान ओली खूप नाराज झाले होते. मात्र नेपाळ शोध अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी सांगितले की, नाथपंथ आणि नेपाळचा संबंध-सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवर खूप महत्त्वपूर्ण आहे. गोरखनाथ हे नेपाळचे राजगुरू होते. तसेच नेपाळच्या मुद्रांवर गोरखनाथ यांचे नाव असते. सध्या या मुद्रेवर पृथ्वीनाथ यांची कट्यार मुद्रित केलेली आहे. कुठल्याही देशाची राजमुद्रा ही त्या देशाचे प्रतीक असते. ज्या प्रकारे भारतात अशोकचक्र आणि महात्मा गांधींची प्रतिमा मुद्रित केलेली असते. त्याप्रमाणेच नेपाळच्या मुद्रेवर गोरखनाथ आणि नाथपंथाशी संबंधित प्रतीके मुद्रित केली जातात. त्यांचा तेथील जनमानसावर मोठा प्रभाव आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

तेथील डाव्या सरकारलासुद्धा ही प्रतिके हटवणे शक्य झालेले नाही. मात्र भारतालाही भारत आणि नेपाळमधील संबंधांचा दुवा म्हणून या गोष्टीचा कधी फायदा घेता आलेला नाही. जर तसा फायदा घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते, असे प्रदीप यांनी सांगितले. त्यामुळे या सांस्कृतिक संबंधांच्या माध्यमातून दोन्ही देशांतील बिघडलेले राजकीय संबंध दुरुस्त करू शकतात.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथIndiaभारतNepalनेपाळ