शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

भारत-नेपाळमधील कटुता दूर करण्यात योगी बजावू शकतात महत्त्वाची भूमिका, हे आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:31 IST

भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते

ठळक मुद्देगोरखनाथ मंदिर आणि सर्वसामान्य लोकांमधील चांगल्या संबंधांच्या मदतीने दोन्ही देशातील संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकतेनाथ संप्रदायाचे केंद्र असलेले गोरखपूर येथील गोरक्षपीठ आणि गोरक्षपीठाधीश्वर यांना नेपाळमधील जनमानसात श्रद्धेचे स्थान आहेनेपाळच्या मुद्रेवर गोरखनाथ आणि नाथपंथाशी संबंधित प्रतीके मुद्रित केली जातात. त्यांचा तेथील जनमानसावर मोठा प्रभाव आहे

 गोरखपूर - एकीकडे सीमेवर चीनकडून घुसखोरी सुरू असतानाच दुसरीकडे नेपाळनेही सीमाप्रश्नवरून कुरापतखोरी करून भारताची चिंता वाढवली आहे. चीनच्या इशाऱ्यावर चालत असलेल्या नेपाळने दोन्ही देशांमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेला रोटीबेटी व्यवहारही मोडीत काढण्याइतपत मजल मारली आहे. मात्र दोन्ही देशांमधील संबंधामध्ये आलेली कटुता आणि वैरत्व मिटवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा आहे.

गोरखनाथ मंदिर आणि सर्वसामान्य लोकांमधील चांगल्या संबंधांच्या मदतीने दोन्ही देशातील संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे नाथ संप्रदायाचे केंद्र असलेले गोरखपूर येथील गोरक्षपीठ आणि गोरक्षपीठाधीश्वर यांना नेपाळमधील जनमानसात श्रद्धेचे स्थान आहे.   

 सध्याचे गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी नेपाळला आपल्या राजकीय सीमांची आखणी करताना तिबेटची काय अवस्था झाली, ते विचारात घ्यावे असा सल्ला दिल्ला होता. मात्र योगींच्या या सल्ल्यामुळे नेपाळचे पंतप्रधान ओली खूप नाराज झाले होते. मात्र नेपाळ शोध अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी सांगितले की, नाथपंथ आणि नेपाळचा संबंध-सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवर खूप महत्त्वपूर्ण आहे. गोरखनाथ हे नेपाळचे राजगुरू होते. तसेच नेपाळच्या मुद्रांवर गोरखनाथ यांचे नाव असते. सध्या या मुद्रेवर पृथ्वीनाथ यांची कट्यार मुद्रित केलेली आहे. कुठल्याही देशाची राजमुद्रा ही त्या देशाचे प्रतीक असते. ज्या प्रकारे भारतात अशोकचक्र आणि महात्मा गांधींची प्रतिमा मुद्रित केलेली असते. त्याप्रमाणेच नेपाळच्या मुद्रेवर गोरखनाथ आणि नाथपंथाशी संबंधित प्रतीके मुद्रित केली जातात. त्यांचा तेथील जनमानसावर मोठा प्रभाव आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

तेथील डाव्या सरकारलासुद्धा ही प्रतिके हटवणे शक्य झालेले नाही. मात्र भारतालाही भारत आणि नेपाळमधील संबंधांचा दुवा म्हणून या गोष्टीचा कधी फायदा घेता आलेला नाही. जर तसा फायदा घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते, असे प्रदीप यांनी सांगितले. त्यामुळे या सांस्कृतिक संबंधांच्या माध्यमातून दोन्ही देशांतील बिघडलेले राजकीय संबंध दुरुस्त करू शकतात.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथIndiaभारतNepalनेपाळ