शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांनी 'ते' विधान मागे घ्यावं, फक्त स्पष्टीकरण पुरेसं नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:13 IST

बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचारांबाबत केलेल्या विधानावरुन डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना थेट पत्रच लिहिलं आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे.

ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आणि इंडियन मेडिकल असोसिएशननं बाबा रामदेव यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यासोबत बाबा रामदेव यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. 

"संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

"ॲलोपॅथी उपचारांबाबत आणि डॉक्टरांबद्दलच्या विधानावरुन देशातील नागरिकांच्या भावना खूप दुखावल्या आहेत. जनतेच्या या भावनांबाबत मी तुम्हाला फोनवरही कल्पना दिली आहे. शनिवारी तुम्ही जे स्पष्टीकरण म्हणून पत्रक जारी केलं ते झालेल्या जखमांवर मलमपट्टी लावण्यासाठी पुरेसं नाही. सध्याच्या कठीण काळात ॲलोपॅथी आणि डॉक्टरांनी कोरोनातून रुग्णांना वाचवून खूप मोठं काम केलं आहे. ॲलोपॅथी औषधांमधून अनेकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळे ॲलोपॅथी औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं तुमचं विधान अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाविरोधातील लढाई सामूहिकरित्याच लढता येईल याचं भान प्रत्येकानं बाळगायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. 

रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या; IMA ने पाठविली कायदेशीर नोटीस

लोपॅथीला दिवाळखोरी ठरवणं दुर्दैव"कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी चिकित्सेला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोरी ठरवणं अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त १.१३ टक्के आणि बरं होण्याचं प्रमाण ८८ टक्के इतकं आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचं सर्वात मोठं योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधनं ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविण्यासारखं आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी अजिबात संतुष्ट नाही", असं रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस