शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

2017 मध्ये भारतीय लष्कराने घातले तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:56 IST

सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल...

नवी दिल्ली/जम्मू - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.2017 मध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. त्याला भारतीय लष्कराकडूनही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. काही वेळा भारतीय लष्कराने केलेली कारवाई एवढी तीव्र होती की, पाकिस्तानला पांढरे निषाण फडकवून सीजफायरसाठी विनवणी करावी लागली. सीमारेषेजवळून पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून सप्टेंबर 2017 मध्ये ऑपरेशन अर्जुन चालवण्यात आले होते. त्यावेळी भारतविरोधी कारवायांना मदत करणारे पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि रेंजर्समधील अधिकाऱ्यांची घरे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणे पाकिस्तानला भाग पडले होते.   त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ताब्यातील भागात 250 ते 300 मीटर आत प्रवेश करून आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. मात्र ही सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई नव्हती. पण लष्करी विभागात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असे नाव दिलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर हल्लीच बीएसएफने आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून केला होता.  याशिवाय गेल्या वर्षभरात लष्कराने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे, या अभियानांतर्गत लष्कराने दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर