शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

2017 मध्ये भारतीय लष्कराने घातले तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:56 IST

सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल...

नवी दिल्ली/जम्मू - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.2017 मध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. त्याला भारतीय लष्कराकडूनही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. काही वेळा भारतीय लष्कराने केलेली कारवाई एवढी तीव्र होती की, पाकिस्तानला पांढरे निषाण फडकवून सीजफायरसाठी विनवणी करावी लागली. सीमारेषेजवळून पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून सप्टेंबर 2017 मध्ये ऑपरेशन अर्जुन चालवण्यात आले होते. त्यावेळी भारतविरोधी कारवायांना मदत करणारे पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि रेंजर्समधील अधिकाऱ्यांची घरे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणे पाकिस्तानला भाग पडले होते.   त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ताब्यातील भागात 250 ते 300 मीटर आत प्रवेश करून आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. मात्र ही सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई नव्हती. पण लष्करी विभागात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असे नाव दिलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर हल्लीच बीएसएफने आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून केला होता.  याशिवाय गेल्या वर्षभरात लष्कराने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे, या अभियानांतर्गत लष्कराने दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर