शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

2017 मध्ये भारतीय लष्कराने घातले तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:56 IST

सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल...

नवी दिल्ली/जम्मू - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.2017 मध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. त्याला भारतीय लष्कराकडूनही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. काही वेळा भारतीय लष्कराने केलेली कारवाई एवढी तीव्र होती की, पाकिस्तानला पांढरे निषाण फडकवून सीजफायरसाठी विनवणी करावी लागली. सीमारेषेजवळून पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून सप्टेंबर 2017 मध्ये ऑपरेशन अर्जुन चालवण्यात आले होते. त्यावेळी भारतविरोधी कारवायांना मदत करणारे पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि रेंजर्समधील अधिकाऱ्यांची घरे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणे पाकिस्तानला भाग पडले होते.   त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ताब्यातील भागात 250 ते 300 मीटर आत प्रवेश करून आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. मात्र ही सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई नव्हती. पण लष्करी विभागात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असे नाव दिलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर हल्लीच बीएसएफने आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून केला होता.  याशिवाय गेल्या वर्षभरात लष्कराने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे, या अभियानांतर्गत लष्कराने दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर