शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्लीकरांना ‘शब्द’पुलाने जोडणार; मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंतराव चव्हाण निबंध लेखन स्पर्धा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 08:16 IST

सहभागी स्पर्धकांमधून ३ विजेते निवडण्यात येणार असून, विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढील महिन्यामध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. तत्पूर्वी, दिल्लीतील मराठी भाषिकांना ‘शब्द’पुलाने जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’तर्फे दिल्लीतील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंतराव चव्हाण निबंध लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी एक हजार ते बाराशे शब्दमर्यादा असून, स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिल्ली ऐतिहासिक संबंध, भारतीय संविधानाची यशस्वी ७५ वर्षे, अभिजात मराठी, लोकशाहीच्या चष्म्यातून भारत,  आरक्षण : साध्य की साधन हे पाच विषय ठेवण्यात आले आहेत. सहभागी स्पर्धकांमधून ३ विजेते निवडण्यात येणार असून, विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास स्वेटशर्ट, पुस्तक, डायरी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत, आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट, ५३/४, पहिला मजला, हॉटेल मडोणाजवळ ओल्ड राजेंद्र नगर, दिल्ली या पत्त्यावर आपले निबंध पाठवावेत, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :delhiदिल्ली