शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:46 IST

दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले.

नवी दिल्ली: सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्याने यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या मुसळधार पावसाने पुराचे पाणी काढण्यास जास्त वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काल संध्याकाळपासून दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. तर आयटीओ आणि राजघाटसह शहरातील प्रमुख भाग पाण्याखाली गेले. आज सकाळपासूनच दिल्लीतील अनेक भाग दाट ढगांनी व्यापले आहेत. आजही पाऊस पडला तर दिल्लीतील यमुनेच्या काठावरील भागात पुराचे स्वरूप आणखी बिकट होऊ शकते. आज सकाळीही येथील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. यमुनेची पाण्याची पातळी आता २०६.०८ मीटर आहे. जे काही दिवसांपूर्वीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा अडीच मीटरने खाली आहे.

सध्या यमुना नदी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. यमुनेतील धोक्याची पातळी २०५.३३ मीटर आहे. त्याचबरोबर यमुना बाजार, आयटीओ, लाल किल्ला, काश्मिरी गेट या परिसरात पाणी साचले आहे. एनडीआरएफच्या १६ तुकड्या बाधित भागात तैनात आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी दिल्लीत आतापर्यंत १५००हून अधिक लोकांना वाचवले आहे. तसेच ६०००हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. आयटीओजवळील यमुना पुलाचे जाम झालेले गेट उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये लष्कर आणि नौदल मदत करत आहे.

हथिनीकुंडातील पाणी दिल्लीकडेच कसे? 

दिल्लीत आलेल्या महापुरासाठी जबाबदार कोण यावरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना बाजूला ठेवून हथिनीकुंडातील पाणी केवळ दिल्लीकडे येणाऱ्या पूर्व कालव्यातून सोडण्यात आल्याचा आरोप जलपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातून आलेल्या पुरामुळे दिल्लीतील यमुनेला पूर आला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हथिनीकुंडातून कशा पद्धतीने पाणी सोडले जाते, याची चौकशी व्हायला हवी, असे महसूलमंत्री आतिशी म्हणाल्या. 

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीRainपाऊस