शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

यमुनेची जलपातळी अजूनही धोक्याच्या चिन्हावर; पाऊस पडल्यास दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:46 IST

दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले.

नवी दिल्ली: सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्याने यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या मुसळधार पावसाने पुराचे पाणी काढण्यास जास्त वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काल संध्याकाळपासून दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. तर आयटीओ आणि राजघाटसह शहरातील प्रमुख भाग पाण्याखाली गेले. आज सकाळपासूनच दिल्लीतील अनेक भाग दाट ढगांनी व्यापले आहेत. आजही पाऊस पडला तर दिल्लीतील यमुनेच्या काठावरील भागात पुराचे स्वरूप आणखी बिकट होऊ शकते. आज सकाळीही येथील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. यमुनेची पाण्याची पातळी आता २०६.०८ मीटर आहे. जे काही दिवसांपूर्वीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा अडीच मीटरने खाली आहे.

सध्या यमुना नदी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. यमुनेतील धोक्याची पातळी २०५.३३ मीटर आहे. त्याचबरोबर यमुना बाजार, आयटीओ, लाल किल्ला, काश्मिरी गेट या परिसरात पाणी साचले आहे. एनडीआरएफच्या १६ तुकड्या बाधित भागात तैनात आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी दिल्लीत आतापर्यंत १५००हून अधिक लोकांना वाचवले आहे. तसेच ६०००हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. आयटीओजवळील यमुना पुलाचे जाम झालेले गेट उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये लष्कर आणि नौदल मदत करत आहे.

हथिनीकुंडातील पाणी दिल्लीकडेच कसे? 

दिल्लीत आलेल्या महापुरासाठी जबाबदार कोण यावरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना बाजूला ठेवून हथिनीकुंडातील पाणी केवळ दिल्लीकडे येणाऱ्या पूर्व कालव्यातून सोडण्यात आल्याचा आरोप जलपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातून आलेल्या पुरामुळे दिल्लीतील यमुनेला पूर आला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हथिनीकुंडातून कशा पद्धतीने पाणी सोडले जाते, याची चौकशी व्हायला हवी, असे महसूलमंत्री आतिशी म्हणाल्या. 

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीRainपाऊस