शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:19 IST

राजधानीच्या अनेक भागांत महापुराचे पाणी शिरले; पाणीपातळी २०७.३१ मीटरवर

नवी दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या पाण्यामुळे नोएडा व गाझियाबादमध्ये स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. या परिसरातील अनेक भागांत सध्या गुडघ्याच्या वर पाणी आहे. 

ताजमहालापर्यंत लाटा यमुनेच्या पाण्याच्या लाटा आता आग्रा येथील ताजमहालाच्या मागच्या बाजूस धडकू लागल्या आहेत. ताजच्या व्ह्यू पॉइंटपर्यंत पाणी पोहोचले असून बांधांच्या गेटमधून सतत पाणी सोडले जात आहे. पुरामुळे वृंदावनचा परिक्रमा मार्ग पाण्यात बुडाला असून यमुनेत विविध धरणे व प्रकल्पांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण देश आपदग्रस्तांच्या सोबत आहे : राष्ट्रपतीनैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या जीवित व मालमत्तांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशा संकटात संपूर्ण देश आपदग्रस्तांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, आसामसह इतर भागांत जीवितहानीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

पंजाबमध्येही लोक झाले हवालदिल- लुधियाना जिल्ह्यात सतलज नदीच्या पुरामुळे अनेक गावांना फटका बसला असून आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पाहता या भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.- पंजाबमध्ये आतापर्यंत पूर व दुर्घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३ झाली असून सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.

काश्मीरवर आभाळ कोपले, मदत मिळेनाजम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक सखल भाग पाण्यात आहेत. विशेषत: बडगाम, पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यांतील बहुतांश गावांत स्थिती अत्यंत बिकट असून या भागात प्रशासकीय मदत अजूनही पोहोचलेली नाही.दरम्यान, उत्तर भारतात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांत पावसाचा जोर ओसरला असून मदतकार्याला वेग आला आहे. 

२०१४ च्या आठवणी ताज्याझेलम नदीच्या पुरात यावर्षी काश्मीरमध्ये हाहाकार माजला होता. अनेक घरे, दुकाने आणि व्यवसाय यामुळे पाण्यात गेले होते. उपजीविकेची सर्व साधनेच नष्ट झाली. काश्मिरी लोकांच्या २०१४च्या आठवणी यावर्षी पुन्हा ताज्या झाल्या. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्ली