शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Y S Jagan Mohan Reddy Cabinet Reshuffle: जगन मोहन रेड्डी यांचे २० मंत्री राजीनामा देणार; राज्यपालांना यादी सोपविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:51 IST

Andhra Pradesh Cabinet Reshuffle: रेड्डी यांनी हा निर्णय घेण्याआधीच दिल्लीत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

आंध्र प्रदेश सरकारमध्ये मोठी घडामोड घडणार आहे. यामध्ये ९ किंवा ११ एप्रिलला मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्री मंडळातील बहुतांश मंत्री राजीनामा देणार आहेत. रेड्डी यांनी या मंत्र्यांची यादी राज्यपालांकडे सोपविली आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन यांच्या मंत्रिमंडळात एकूण २४ मंत्री आहेत. यापैकी तीन ते चारच मंत्री आपल्या मंत्रिपदी कायम राहणार असल्याचे समजते आहे. यामुळे जवळपास २० मंत्री राजीनामा देणार आहेत. अंतिम यादी रेड्डी यांनी राज्यपालांकडे सोपविल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. 

रेड्डी यांनी हा निर्णय घेण्याआधीच दिल्लीत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विकास योजनांच्या स्थितीवर चर्चा केली होती. राज्यात परतताच त्यांनी मंत्रिमंडळात मोठेफेरबदल करण्याचा निर्णय घेतला. आता कोणाचे मंत्रिपद जाणार आणि कोण राहणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

याचबरोबर हे नवे २० मंत्री कोण असतील, कोणाला कोणते खाते मिळेल याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.  8 जून 2019 ला रेड्डी यांच्या या मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. त्यानंतर हा मोठा बदल असणार आहे. पुढील वर्षी निवडणूक असेल, यामुळे रेड्डी यांनी नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश