शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

Unemployment: चिंताजनक! सणासुदीच्या काळामध्ये 54.6 लाख लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 9:05 AM

सीएमआयईच्या अहवालातून झाले स्पष्ट. देशातील रोजगाराच्या स्थितीचा मासिक आढावा सीएमआयईने एका अहवालाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये  ४०६.२४ दशलक्ष लोकांकडे रोजगार होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑक्टोबरमध्ये देशातील तब्बल ५४.६ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात लोकांकडे रोजगार नसणे ही चिंताजनक बाब आहे. 

देशातील रोजगाराच्या स्थितीचा मासिक आढावा सीएमआयईने एका अहवालाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये  ४०६.२४ दशलक्ष लोकांकडे रोजगार होता. ऑक्टोबरमध्ये हा आकडा घटून ४००.७७ दशलक्ष झाला. राष्ट्रीय श्रमशक्ती सहभागिता दर सप्टेंबरमध्ये ४०.६६ टक्के होता. तोही ऑक्टोबरमध्ये घटून ४०.४१ टक्के झाला. 

सीएमआयईने म्हटले की, सणासुदीच्या हंगामात रोजगारात वाढ होईल, असा अंदाज होता. तथापि, तसे होऊ शकले नाही. रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे भाकित काही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले होते. तथापि, तसे होताना दिसून आले नाही. जानेवारीमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.५२ टक्के होता. त्यात खेड्यातील बेरोजगारी ५.८१ टक्के आणि शहरातील बेरोजगारी ८.०९ टक्के होती.

शहरापेक्षा ग्रामीण भागातील दर जास्तरोजगाराच्या बाबतीत शहरातील स्थिती तुलनेने चांगली असून, ग्रामीण भागातील स्थिती वाईट आहे. ऑक्टोबरमध्ये शहरातील बेरोजगारी १.२४ टक्क्यांनी घटली आहे. ग्रामीण भागात मात्र बेरोजगारीचा दर १.७५ टक्क्यांनी वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण बेरोजगारीचा दर वाढून ७.७५ टक्के झाला. सप्टेंबरमध्ये तो ६.८७ टक्के होता. बेरोजगारीत वाढ होण्याचा दर शहरात घसरून ७.३८ टक्के झाला. हा तीन महिन्याचा नीचांक आहे. ग्रामीण भागात मात्र तो वाढून ७.९१ टक्के झाला असून, हा चार महिन्याचा उच्चांक आहे.

टॅग्स :jobनोकरी