शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

By महेश गलांडे | Published: December 13, 2020 4:35 PM

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय.

ठळक मुद्देबालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते.

डेहरादून - बिहारच्या आराह येथील बालबंका तिवारी या तरुणाने सैन्य दलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अतिशय खडतर आणि संघर्षमय प्रवास करुन त्यांनी हे यश संपादन केलंय. मुलाच्या अंगावर सैन्य दलाची गणवेश पाहून त्याच्या आई आणि पत्नील अत्यानंद झाला. त्यावेळी, आपल्या मुलाने महाविद्यालयीन जीवनात जगताना केलेल्या कष्टाची आठवणण झाल्याने आई मुन्ना देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. बालबंका यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, 50 ते 100 रुपये मिळविण्यासाठी ते दिवसभर म्हणजेच 12 तास काम करत. बालबंका यांचे वडिल शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना लवकरच कामावर जावे लागले. 12 वी नंतर आरा येथून मी ओडिशातील राऊरकला येथे गेलो. दरम्यानच्या काळात लोखंडाच्या कंपनीत आणि फरसाणच्या कंपनीतही काम केलं. येथून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं, असं बालबंका यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कमवा आणि शिका असाच त्यांचा प्रवास राहिला.

यापूर्वी होते सैन्यदलात शिपाई

सैन्य दलात अधिकारी बनण्यापूर्वी ते सैन्य दलातच शिपाई म्हणून भरती झाले होते. तिवारी यांनी 2012 मध्ये भोपाळच्या ईएमई सेंटरमधून आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास केली होती. शिपाई पदी रुजू झाल्यानंतरच त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेजसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेत 2017 साली त्यांना यश मिळालं. आता सैन्य दलात अधिकारी बनून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्यानं मला अत्यानंद झाल्याचे ते म्हणतात.

वडिलांनाही अत्यानंद 

आपल्या एका नातेवाईकांकडून बालबंका यांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना गावात मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळेच, मी सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न वारंवार पाहात होतो, त्यापासून मी कधीही दूर पळालो नाही. आता, माझे वडिल उद्या वर्तमानपत्रात बातमी पाहतील आणि संपूर्ण गावाला माझ्या यशाची गोष्टी सांगतील, असेही बालबंका यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOdishaओदिशाBiharबिहार