शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

कोणत्या राज्यातील लोक आठवड्याला सर्वाधिक तास काम करतात?; बिहारनं दिला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:47 IST

भारत, चीन, मलेशिया आणि फिलिपिंस एकसारखेच काम करतात परंतु आपली प्रतिव्यक्ती जीडीपी कमी आहे.

नवी दिल्ली - अलीकडेच भारतातील वर्क कल्चरबाबत समोर आलेल्या रिपोर्टनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद आणि २०१९ च्या टाइम यूज सर्वेच्या आधारे या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. देशात गुजरात राज्यातील लोक भारतात सर्वात जास्त तास काम करतात असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याठिकाणचे लोक कठीण परिश्रम आणि कामाप्रती समर्पण यासाठी ओळखले जातात. गुजरात देशातील औद्योगिक आणि व्यापारी नकाशावर वेगाने पुढे येत आहे तर दुसरीकडे बिहारमधील लोक सर्वात कमी तास काम करतात असं रिपोर्टमध्ये आलं आहे.

गोव्यात स्मार्ट वर्क स्ट्रॅटर्जी

या रिपोर्टनुसार, गोव्यात लोक कमी तास काम करत असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रगतशील आहेत. गोव्याने स्मार्ट वर्क मंत्र अवलंबला आहे. इथं लोक कमी वेळात जास्त काम करतात आणि आपल्या आयुष्याचा आनंदही घेतात. गोव्याचं हे यश पाहता केवळ जास्त काम करणेचे पुरेसे नाही तर स्मार्टपद्धतीने काम करण्याची गरज असल्याचं दाखवून देतात.

त्याशिवाय शहरात राहणाऱ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोक जास्त काम करतात. शहरातील जलद गतीने धावणारी स्पर्धात्मक लाईफस्टाईल हे त्यामागचं कारण असू शकते असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक काम करतात, जी समाजातील नेहमीची परंपरा आहे

सरकारी नोकरी - आराम की आव्हान?

रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचारी खासगी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी काम करतात परंतु त्याचा अर्थ सरकारी नोकरी आरामदायी आहे असं नाही. प्रत्येक नोकरीत आव्हाने आहेत.

जास्त काम, कमी कमाई?

जास्त काम केल्याने जादा कमाई होते असं नाही. गोवा यामागचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या रिपोर्टमुळे आपण योग्य प्रकारे काम करतोय की नाही, आपण केवळ जास्त काम करण्यावर की स्मार्ट वर्कवरही लक्ष देतोय हे देखील उघड झालं. 

दरम्यान, भारत, चीन, मलेशिया आणि फिलिपिंस एकसारखेच काम करतात परंतु आपली प्रतिव्यक्ती जीडीपी कमी आहे. उत्पादनवाढीवर आपल्याला भर देण्याची आवश्यकता असल्याचं रिपोर्टमधून दिसते. स्मार्क वर्क, इनोवेशन आणि टेक्नोलॉजीचा वापर करायला हवा जेणेकरून कमी काळात जास्त काम होऊ शकते आणि त्यातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. 

राज्यांची अवस्था काय?

रिपोर्टनुसार, गुजरातचे ७.२ टक्के कर्मचारी आठवड्याला ७० हून अधिक तास काम करतात. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांचाही जास्त काम करणाऱ्या राज्यांत समावेश आहे. दुसरीकडे बिहारमध्ये सर्वात कमी लोक तासांवर काम करतात. बिहारमधील अशा लोकांची संख्या गुजरातच्या तुलनेत सात पटीने कमी आहे. दिल्लीत रोज ८.३० तास काम करणारे लोक आहेत. गोव्यात लोक ५.५ तास काम करतात. पूर्वात्तर राज्यातही दिवसाला ६ तास काम केले जाते. 

टॅग्स :GujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र