शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या राज्यातील लोक आठवड्याला सर्वाधिक तास काम करतात?; बिहारनं दिला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:47 IST

भारत, चीन, मलेशिया आणि फिलिपिंस एकसारखेच काम करतात परंतु आपली प्रतिव्यक्ती जीडीपी कमी आहे.

नवी दिल्ली - अलीकडेच भारतातील वर्क कल्चरबाबत समोर आलेल्या रिपोर्टनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद आणि २०१९ च्या टाइम यूज सर्वेच्या आधारे या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. देशात गुजरात राज्यातील लोक भारतात सर्वात जास्त तास काम करतात असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याठिकाणचे लोक कठीण परिश्रम आणि कामाप्रती समर्पण यासाठी ओळखले जातात. गुजरात देशातील औद्योगिक आणि व्यापारी नकाशावर वेगाने पुढे येत आहे तर दुसरीकडे बिहारमधील लोक सर्वात कमी तास काम करतात असं रिपोर्टमध्ये आलं आहे.

गोव्यात स्मार्ट वर्क स्ट्रॅटर्जी

या रिपोर्टनुसार, गोव्यात लोक कमी तास काम करत असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रगतशील आहेत. गोव्याने स्मार्ट वर्क मंत्र अवलंबला आहे. इथं लोक कमी वेळात जास्त काम करतात आणि आपल्या आयुष्याचा आनंदही घेतात. गोव्याचं हे यश पाहता केवळ जास्त काम करणेचे पुरेसे नाही तर स्मार्टपद्धतीने काम करण्याची गरज असल्याचं दाखवून देतात.

त्याशिवाय शहरात राहणाऱ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोक जास्त काम करतात. शहरातील जलद गतीने धावणारी स्पर्धात्मक लाईफस्टाईल हे त्यामागचं कारण असू शकते असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक काम करतात, जी समाजातील नेहमीची परंपरा आहे

सरकारी नोकरी - आराम की आव्हान?

रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचारी खासगी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी काम करतात परंतु त्याचा अर्थ सरकारी नोकरी आरामदायी आहे असं नाही. प्रत्येक नोकरीत आव्हाने आहेत.

जास्त काम, कमी कमाई?

जास्त काम केल्याने जादा कमाई होते असं नाही. गोवा यामागचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या रिपोर्टमुळे आपण योग्य प्रकारे काम करतोय की नाही, आपण केवळ जास्त काम करण्यावर की स्मार्ट वर्कवरही लक्ष देतोय हे देखील उघड झालं. 

दरम्यान, भारत, चीन, मलेशिया आणि फिलिपिंस एकसारखेच काम करतात परंतु आपली प्रतिव्यक्ती जीडीपी कमी आहे. उत्पादनवाढीवर आपल्याला भर देण्याची आवश्यकता असल्याचं रिपोर्टमधून दिसते. स्मार्क वर्क, इनोवेशन आणि टेक्नोलॉजीचा वापर करायला हवा जेणेकरून कमी काळात जास्त काम होऊ शकते आणि त्यातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. 

राज्यांची अवस्था काय?

रिपोर्टनुसार, गुजरातचे ७.२ टक्के कर्मचारी आठवड्याला ७० हून अधिक तास काम करतात. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांचाही जास्त काम करणाऱ्या राज्यांत समावेश आहे. दुसरीकडे बिहारमध्ये सर्वात कमी लोक तासांवर काम करतात. बिहारमधील अशा लोकांची संख्या गुजरातच्या तुलनेत सात पटीने कमी आहे. दिल्लीत रोज ८.३० तास काम करणारे लोक आहेत. गोव्यात लोक ५.५ तास काम करतात. पूर्वात्तर राज्यातही दिवसाला ६ तास काम केले जाते. 

टॅग्स :GujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र