शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या 'या' सवयी कंटाळलेल्या पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 11:41 IST

क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देभोपाळमध्ये पतीच्या सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी न करण्याच्या वाईट सवयीला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे.भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे.पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

भोपाळ - संसारात पती पत्नीत अनेक कारणांवरून भांडणं ही होत असतात. काही वेळा सततच्या भांडणाला वैतागून घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय देखील घेतला जातो. क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. पण जर कोणी पती अंघोळ करत नाही म्हणून घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. पती सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी करत नाही म्हणून एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये पतीच्या सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी न करण्याच्या वाईट सवयीला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. 25 वर्षाचा तरुण आणि 23 वर्षाची तरुणी यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. पतीच्या वाईट सवयीला पत्नी कंटाळली होती. तिने अनेकदा पतीला समाजून या सवयीत बदल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने अद्याप आपल्या सवयीत बदल केलेला नाही. यामुळेच पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे. दोघांच्या संमतीनंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले. घटस्फोट हवा असल्यास दोघांना सहा महिने एकमेकांपासून दूर राहावे लागेल असे न्यायाधीश आर.एन.चंद यांनी सांगितले आहे. 

आंघोळ न केल्याने पतीच्या शरीराचा दुर्गंध येतो आणि अंघोळ करण्यास सांगितल्यावर तो कपड्यांवर अत्तर लावतो अशी तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच भविष्याचा विचार करता पती पैसे वाचवत नाही असं पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता न्यायालयाने दोघांना सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. माझे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे मी ठरवेन. पत्नीने मला सांगायची गरज नाही असे पतीने म्हटले आहे. तसेच पत्नीच्या सांगण्यावरून आपण बदलणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Divorceघटस्फोटMadhya Pradeshमध्य प्रदेश