शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:39 IST

तेलंगणामध्ये प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने तीन मुलांची हत्या केली

Telangana Crime: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कानने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर आता तेलंगणामध्ये वर्गमित्र आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने तिच्या तीन मुलांची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील संगारेड्डीमध्ये महिलेने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सगळ्या कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिलेने स्वतःच्या हाताने तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय रजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे.

तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये रजिताने तिच्या तीन मुलांना विष देऊन मारल्याचा आरोप होता. रजिता तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती. यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला रजिताना जेवणातून विष देऊन मुलांना मारल्याचा आरोप होता. रजिताचा पतीला संपवण्याचाही डाव होता मात्र त्याने जेवण न केल्याने तो वाचला असेही म्हटलं जात होते. मात्र तपासादरम्यान, रजिताने स्वतःच्या मुलांचा गळा दाबल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार आणि रजिता काही दिवसांपूर्वी शाळेच्या गेट टु गेदरच्या कार्यक्रमात भेटले होते. रजिता आणि चेन्नईय्या यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. त्यावेळी रजिता ३० वर्षांची आणि चेन्नईय्या ५० वर्षांचे होते. वयाच्या अंतरामुळेच त्यांच्या नात्यात कटुता होती आणि वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टु गेदरला गेली होती, जिथे ती शिवकुमारला अनेक वर्षांनी भेटली. त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांचे प्रेम पुन्हा जिवंत झाले. दोघांमधील नाते इतके घट्ट झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन जीवन सुरू करण्यासाठी, रजिताने तिच्या मुलांनाही मार्गावरून हटवले.

शिवाने सोबत राहण्यासाठी रजिताला तुला मुलांपासून वेगळे व्हावे लागेल, तरच तुझ्याशी लग्न करेल असे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर रजिताने तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. रजिताने तिच्या मुलाला टॉवेलने गळा दाबून मारले. पाण्याच्या टँकर चालक म्हणून काम करणारा चेन्नईया उशिरा घरी परतला. तेव्हा रजिताने त्याला सांगितले माझ्या पोटात खूप दुखत आहे. दही भात खाल्यामुळे माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असेही तिने सांगितले. त्यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलांसह रजिताला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी रजिताकडे कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रजिताने कबुल केले की तिनेच तिच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केला होता. तीन मुलांपैकी एक १२ वर्षांचा, दुसरा १० वर्षांचा आणि तिसरा ८ वर्षांचा होता. यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस