शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:39 IST

तेलंगणामध्ये प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने तीन मुलांची हत्या केली

Telangana Crime: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कानने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर आता तेलंगणामध्ये वर्गमित्र आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने तिच्या तीन मुलांची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील संगारेड्डीमध्ये महिलेने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सगळ्या कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिलेने स्वतःच्या हाताने तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय रजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे.

तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये रजिताने तिच्या तीन मुलांना विष देऊन मारल्याचा आरोप होता. रजिता तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती. यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला रजिताना जेवणातून विष देऊन मुलांना मारल्याचा आरोप होता. रजिताचा पतीला संपवण्याचाही डाव होता मात्र त्याने जेवण न केल्याने तो वाचला असेही म्हटलं जात होते. मात्र तपासादरम्यान, रजिताने स्वतःच्या मुलांचा गळा दाबल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार आणि रजिता काही दिवसांपूर्वी शाळेच्या गेट टु गेदरच्या कार्यक्रमात भेटले होते. रजिता आणि चेन्नईय्या यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. त्यावेळी रजिता ३० वर्षांची आणि चेन्नईय्या ५० वर्षांचे होते. वयाच्या अंतरामुळेच त्यांच्या नात्यात कटुता होती आणि वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टु गेदरला गेली होती, जिथे ती शिवकुमारला अनेक वर्षांनी भेटली. त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांचे प्रेम पुन्हा जिवंत झाले. दोघांमधील नाते इतके घट्ट झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन जीवन सुरू करण्यासाठी, रजिताने तिच्या मुलांनाही मार्गावरून हटवले.

शिवाने सोबत राहण्यासाठी रजिताला तुला मुलांपासून वेगळे व्हावे लागेल, तरच तुझ्याशी लग्न करेल असे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर रजिताने तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. रजिताने तिच्या मुलाला टॉवेलने गळा दाबून मारले. पाण्याच्या टँकर चालक म्हणून काम करणारा चेन्नईया उशिरा घरी परतला. तेव्हा रजिताने त्याला सांगितले माझ्या पोटात खूप दुखत आहे. दही भात खाल्यामुळे माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असेही तिने सांगितले. त्यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलांसह रजिताला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी रजिताकडे कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रजिताने कबुल केले की तिनेच तिच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केला होता. तीन मुलांपैकी एक १२ वर्षांचा, दुसरा १० वर्षांचा आणि तिसरा ८ वर्षांचा होता. यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस