शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
4
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
5
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
6
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
7
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
8
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
9
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
10
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
11
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
12
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
13
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
14
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
15
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
16
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
17
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
18
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
19
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
20
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:39 IST

तेलंगणामध्ये प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने तीन मुलांची हत्या केली

Telangana Crime: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुस्कानने प्रियकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर आता तेलंगणामध्ये वर्गमित्र आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने तिच्या तीन मुलांची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील संगारेड्डीमध्ये महिलेने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सगळ्या कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिलेने स्वतःच्या हाताने तीन मुलांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय रजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे.

तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये रजिताने तिच्या तीन मुलांना विष देऊन मारल्याचा आरोप होता. रजिता तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती. यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला रजिताना जेवणातून विष देऊन मुलांना मारल्याचा आरोप होता. रजिताचा पतीला संपवण्याचाही डाव होता मात्र त्याने जेवण न केल्याने तो वाचला असेही म्हटलं जात होते. मात्र तपासादरम्यान, रजिताने स्वतःच्या मुलांचा गळा दाबल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार आणि रजिता काही दिवसांपूर्वी शाळेच्या गेट टु गेदरच्या कार्यक्रमात भेटले होते. रजिता आणि चेन्नईय्या यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. त्यावेळी रजिता ३० वर्षांची आणि चेन्नईय्या ५० वर्षांचे होते. वयाच्या अंतरामुळेच त्यांच्या नात्यात कटुता होती आणि वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टु गेदरला गेली होती, जिथे ती शिवकुमारला अनेक वर्षांनी भेटली. त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांचे प्रेम पुन्हा जिवंत झाले. दोघांमधील नाते इतके घट्ट झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन जीवन सुरू करण्यासाठी, रजिताने तिच्या मुलांनाही मार्गावरून हटवले.

शिवाने सोबत राहण्यासाठी रजिताला तुला मुलांपासून वेगळे व्हावे लागेल, तरच तुझ्याशी लग्न करेल असे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर रजिताने तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. रजिताने तिच्या मुलाला टॉवेलने गळा दाबून मारले. पाण्याच्या टँकर चालक म्हणून काम करणारा चेन्नईया उशिरा घरी परतला. तेव्हा रजिताने त्याला सांगितले माझ्या पोटात खूप दुखत आहे. दही भात खाल्यामुळे माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असेही तिने सांगितले. त्यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलांसह रजिताला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी रजिताकडे कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रजिताने कबुल केले की तिनेच तिच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केला होता. तीन मुलांपैकी एक १२ वर्षांचा, दुसरा १० वर्षांचा आणि तिसरा ८ वर्षांचा होता. यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस