शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

व्हीलचेअर नसल्यामुळे महिलेला करावे लागले 'दिव्य'; नवऱ्याला पाठीवरून आणले सरकारी कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:36 IST

एका अपघातात महिलेच्या पतीचा पाय तुटला होता.

मथुरा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दराऱ्यामुळे सरकारी कारभाराची पद्धत सुधारल्याचे दावा भाजपाचे अनेक नेते आणि समर्थक करतात. मात्र, असल्या इशाऱ्यांना सरकारी बाबू फारशी भीक घालत नसल्याची अनेक उदाहरणे सर्रास पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी कारभारातील असंवेदनशीलपणा समोर आला. एरवी खुद्द पंतप्रधान मोदींकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक सरकारी कामे घरबसल्या करता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो. मात्र, ज्या सरकारी कामांसाठी असल्या तंत्रज्ञानाची खरी निकड असते तिथे सरकारी घोडे कशी पेंड खाते, याचा प्रत्यय या घटनेमुळे आला. मथुरेतील एका दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला यामुळे मोठे दिव्य पार पाडावे लागले. या महिलेचा पती शारीरिकदृष्ट्या अधू असल्यामुळे त्याला दिव्यांग प्रमाणपत्र हवे होते. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याला सरकारी कार्यालयात हजर राहावे लागणार होते. परंतु, हालाखीच्या परिस्थितीमुळे या व्यक्तीकडे बाहेर वावरण्यासाठी लागणारी व्हीलचेअर किंवा अन्य कोणतेही साधन नव्हते.  एका अपघातात महिलेच्या पतीचा पाय तुटला होता. तीन वर्षांपूर्वी हा अपघात झाला होता, तेव्हापासून ही महिला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सीएमओ कार्यालयात फे-या मारत होती. मात्र, अनेक विनवण्या करूनही तिच्या नवऱ्याला दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात नव्हते. मात्र, या खंबीर महिलेने हार मानली नाही. तिने मंगळवारी आपल्या दिव्यांग पतीला पाठीवर उचलून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. याठिकाणी सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर बुधवारी तिच्या पतीला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले.  आपल्या पतीच्या हक्कासाठी खंबीरपणा दाखवणाऱ्या या महिलेचे कौतुक होत आहे. परंतु, दुसरीकडे या घटनेमुळे सरकारच्या या कार्यपद्धतीवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकार