शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खेदजनक; गावात रस्ताच नसल्यानं गर्भवतीला 12 किलोमीटरपर्यंत साडीत गुंडाळून नेलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 18:34 IST

अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे.

हैदराबाद- भारतातल्या अनेक खेड्यांत आज ब-यापैकी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. रस्ता, वीज खेडोपाड्यात घरोघरी पोहोचल्याचं सरकार वारंवार सांगत असतं. परंतु देशातील काही राज्यांत अशीही काही गावं आहेत, तिकडे अद्यापही रस्ताच नाही. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यातील एका गावातही एवढी वर्षं स्वातंत्र्य मिळून रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावक-यांना जिल्ह्यापर्यंत येण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागतं.अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे. विशेष म्हणजे महिलेनं रस्त्यामध्येच मुलाला जन्म दिला. परंतु अँब्युलन्स पोहोचण्याच्या आधीच बाळाचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्ह्यात 22 वर्षीय जिंदम्माला प्रसव कळा सुरू झाल्या. जिंदम्माची परिस्थिती पाहता तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. जिंदम्माचं घर घनदाट जंगलात आहे. त्यामुळे तिथे अँब्युलन्स पोहोचू शकली नाही. त्यानंतर जिंदम्मा हिला गावक-यांनी साडीत गुंडाळून 12 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. परंतु जिंदम्मा हिला वाटेतच जोरजोरात प्रसव कळा होऊ लागल्या. प्रसव कळा सहन न झाल्यानं जिंदम्मा हिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला.परंतु अँब्युलन्स येण्याआधीच बाळाचा मृत्यू झाला. खरं तर स्वातंत्र्याला एवढी वर्षं होऊनही कोंडथमारा गावातून डुग्‍गेरुदरम्यान अद्यापही रस्ता नाही. जिंदम्‍मा यांना पार्वतीपूरम आईटीडीए रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सध्या त्या गर्भवती महिलेला प्लेसेंटोवर ठेवण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून, तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर एस. एन. ज्योती यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश