खरीप अनुदानातून तीन तालुके वगळल्याने नाराजी नंदुरबार जिल्ह्यासाठी ३० कोटी अनुदान प्राप्त

By Admin | Updated: January 8, 2016 23:20 IST2016-01-08T23:20:44+5:302016-01-08T23:20:44+5:30

नंदुरबार : संपुर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असतांना केवळ तीन तालुक्यांसाठी ३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Withdrawing three talukas from Kharif grants, Rs 30 crore grant for Naraji Nandurbar district | खरीप अनुदानातून तीन तालुके वगळल्याने नाराजी नंदुरबार जिल्ह्यासाठी ३० कोटी अनुदान प्राप्त

खरीप अनुदानातून तीन तालुके वगळल्याने नाराजी नंदुरबार जिल्ह्यासाठी ३० कोटी अनुदान प्राप्त

दुरबार : संपुर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असतांना केवळ तीन तालुक्यांसाठी ३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
यंदा सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. शिवाय अनियमित पाऊस झाल्याने खरीपाचे उत्पादन निम्म्यावर आले. प्रशासनाने नजर अंदाज पैसेवारी संपुर्ण जिल्‘ात ५० टक्केच्या आत जाहीर केली. नंतर तीन तालुके वगळले. सुधारीत पैसेवारीच्या आधारे प्रशासनाने ५५ कोटी ४७ लाख रुपयांची अनुदानाची मागणी केली. राज्य शासनाने मात्र केवळ ३० कोटी ६२ लाख रुपयेच मंजूर केले. संपुर्ण जिल्‘ातील शेतकर्‍यांच्या खरीप हंगाम वाया गेला असतांना केवळ तीनच तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Withdrawing three talukas from Kharif grants, Rs 30 crore grant for Naraji Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.