शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:15 IST

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  केंद्र सरकारमधील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि दिग्गज खासदारांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत वय किंवा कामगिरीच्या आधारावर तिकीट कापले जाण्याची चिंता वाटत आहे, तर राज्यसभेच्या खासदारांना लोकसभानिवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते, याची त्यांना धास्ती आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या सात खासदारांना उभे केले गेले. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, रेणुका सिंह यांना केंद्रीय मंत्रिपद सोडून राज्यांमध्ये पाठविण्यात आले. हे पाहून केंद्र सरकारमधील दिग्गज आणि बलाढ्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांना धास्ती बसली आहे. कोणतेही केंद्रीय मंत्री आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल आणि सरकार स्थापन झाल्यास केंद्रीय मंत्री बनविले जाईल, असा दावा करण्याच्या स्थितीत नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. या अंतर्गत तरुण चेहरे पुढे आणायचे आहेत आणि त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत. 

चेहरा कोणताही असो...

तीन राज्यांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांना असे वाटत आहे की, आगामी लोकसभा निवडणूक औपचारिक आहे. लोकांना वाटते की, पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वात  सरकार येणे निश्चित आहे. मग चेहरा कोणताही असो काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करीत आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ