शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

By admin | Updated: January 5, 2017 23:03 IST

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात. मोबाईल वॉलेटही आता वापरकर्त्यांसाठी जीवनाचा एक भाग बनलं आहे. अनेकदा लोक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोबाईल वॉलेटचा वापर करतात. मोबाइलच्या माध्यमातूनच फोन रिचार्ज, टॅक्सीचं बिल भरणं अशी कामे करतात. मोबाइल वॉलेटमुळे बँकेच्या बाहेर रांग न लावता स्वतःची सर्व कामे होतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूएसएसडी, आधार कार्डवर आधारित भीम अ‍ॅप्लिकेशन लोकांच्या सेवेत आहेत. ई-वॉलेटमुळे बिल भरणं, तिकीट बुक करणं, कॅबचं पेमेंट करणं सर्वकाही सहजशक्य झालं आहे. मोबाईलमध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक, एअरटेल मनी, व्होडाफोन एम-पैसा, ऑक्सिजन वॉलेट, चिल्लर, पेयूमनी असे अनेक ई-वॉलेट कार्यरत आहेत. या सर्व अ‍ॅप्समध्ये पेटीएम हे सध्या आघाडीवर आहे. पेटीएमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्स, फूटवेअर आणि कॅशबॅकसारखे ऑफरचाही आपण फायदा घेऊ शकतो. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आता यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीही वापरता येणार आहे. ही नवी प्रणाली एनपीसीआयने विकसित केली आहे. यूपीआयमार्फत पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर यूपीआय अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागत असून, मोबाईल नंबरची नोंद करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आधार नंबर देणंही गरजेचं असेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाणार आहे. तसेच हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता स्वरुपात असणार आहे. तुम्हाला ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडेही यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही बँकेचं अ‍ॅप असणं गरजेचं आहे. तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. मात्र याचे काही तोटेही आहेत. ही मोबाईल वॉलेट कितीपत सुरक्षित आहेत हाच खरा प्रश्नच आहे. मोबाईल हरवल्यास डेटा चोरी होण्याची भीती असते, तर बॅलन्स ट्रान्सफर होण्याचीही शक्यता असते. या यूपीआय प्रणालीच्या सुरक्षेबाबतही अनेक जाणकारांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मोबाईल वॉलेट किती सुरक्षित आहे, हे येत्या काळातच समजणार आहे.