शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

By admin | Updated: January 5, 2017 23:03 IST

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात. मोबाईल वॉलेटही आता वापरकर्त्यांसाठी जीवनाचा एक भाग बनलं आहे. अनेकदा लोक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोबाईल वॉलेटचा वापर करतात. मोबाइलच्या माध्यमातूनच फोन रिचार्ज, टॅक्सीचं बिल भरणं अशी कामे करतात. मोबाइल वॉलेटमुळे बँकेच्या बाहेर रांग न लावता स्वतःची सर्व कामे होतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूएसएसडी, आधार कार्डवर आधारित भीम अ‍ॅप्लिकेशन लोकांच्या सेवेत आहेत. ई-वॉलेटमुळे बिल भरणं, तिकीट बुक करणं, कॅबचं पेमेंट करणं सर्वकाही सहजशक्य झालं आहे. मोबाईलमध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक, एअरटेल मनी, व्होडाफोन एम-पैसा, ऑक्सिजन वॉलेट, चिल्लर, पेयूमनी असे अनेक ई-वॉलेट कार्यरत आहेत. या सर्व अ‍ॅप्समध्ये पेटीएम हे सध्या आघाडीवर आहे. पेटीएमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्स, फूटवेअर आणि कॅशबॅकसारखे ऑफरचाही आपण फायदा घेऊ शकतो. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आता यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीही वापरता येणार आहे. ही नवी प्रणाली एनपीसीआयने विकसित केली आहे. यूपीआयमार्फत पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर यूपीआय अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागत असून, मोबाईल नंबरची नोंद करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आधार नंबर देणंही गरजेचं असेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाणार आहे. तसेच हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता स्वरुपात असणार आहे. तुम्हाला ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडेही यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही बँकेचं अ‍ॅप असणं गरजेचं आहे. तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. मात्र याचे काही तोटेही आहेत. ही मोबाईल वॉलेट कितीपत सुरक्षित आहेत हाच खरा प्रश्नच आहे. मोबाईल हरवल्यास डेटा चोरी होण्याची भीती असते, तर बॅलन्स ट्रान्सफर होण्याचीही शक्यता असते. या यूपीआय प्रणालीच्या सुरक्षेबाबतही अनेक जाणकारांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मोबाईल वॉलेट किती सुरक्षित आहे, हे येत्या काळातच समजणार आहे.