शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 20:07 IST

गेल्या काही दिवसांपासून Tiktok परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली: भारत सरकारने २०२० साली चीनी शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप 'Tiktok'वर बंदी घातली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून हे पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व चर्चांवर केंद्र सरकारने पूर्णविराम लावला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितले की, टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही. 

बंदी का घातली होती?सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जून २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुनही हे अॅप्स काढून टाकण्यात आले. जानेवारी २०२१ मध्ये टिकटॉकवरील बंदी कायमची करण्यात आली. त्यावेळी टिकटॉकसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ होती. भारतात त्याचे २० कोटींहून अधिक युजर्स होते. टिकटॉक व्यतिरिक्त, हेलो आणि कॅपकट सारख्या बाईटडान्सच्या इतर अ‍ॅप्सदेखील काढून टाकण्यात आले. 

चिनी गुंतवणुकीवरही बंदीटिकटॉकवरील बंदीनंतर प्रश्न उपस्थित होतो की, चिनी गुंतवणूकदार भारतात परत येतील का? यावर मंत्री वैष्णव म्हणाले की, भारताची धोरणे पारदर्शक आहेत आणि कोणतेही बदल झाले तरी सर्वांना माहिती दिली जाईल. एप्रिल २०२० मध्ये सरकारने एफडीआय धोरण कडक केले होते. आता भारताच्या सीमेवरील देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीसाठी सरकारी मान्यता आवश्यक आहे. या निर्णयामुळे टेन्सेंट, अलिबाबा आणि अँट फायनान्शियल सारख्या चिनी गुंतवणूकदारांचे वर्चस्व कमी झाले आहे. 

तांत्रिक सहकार्यावर मर्यादित चर्चामात्र, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाबाबत भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरू आहे. वैष्णव म्हणतात की, या उद्योगात जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. अहवाल असे सूचित करतात की, दोन्ही देशांच्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या क्षेत्रात संयुक्त उपक्रम आणि तांत्रिक भागीदारी शोधत आहेत. परंतु टिकटॉकसारख्या अॅप्सच्या परत येण्याची शक्यता अजूनही खूप दूर आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकारchinaचीनIndiaभारत