शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीपूर्वी बनणार तिसरी आघाडी? अखिलेश यादवांनी दिले संकेत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 22:46 IST

Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीप्रीव तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीप्रीव तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले आहे. त्यांनी दिल्लीमध्ये प्रशासनासंदर्भातील वादात त्यांनी अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिलं आहे. त्याबरोबरच कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच २०२४ पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याचे आणि प्रचार अभियानाचे नेतृत्व करण्याचे संकेत अखिलेश यादव यांनी दिले आहे.

अखिलेश यादव यांनी सांगितले की, मी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहे. निवडणूकही लढणार आहे. दोन्ही कामं होतील, पण राजकारणामध्ये रिकामी का बसायचं. हेच शिकलोय आणि हेच करत राहणार आहे. ओदिशा दुर्घटनेवरही अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेनमध्ये इतरे मॉर्डन पार्ट्स लागले आहेत. कवचबाबत बोललं जात होतं. मात्र हे कवच नाही आहे. तर भाजपाचं कपट आहे. ज्यांना नोकरी मिळणार होती. त्यांना सुरक्षारक्षकाची कामही मिळत नव्हती.

दरम्यान, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर अखिलेख यादव यांनी सांगितले की, मला वाटतं की, विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यावर काही ना काही अवश्य विचार करतील. एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे केंद्र सरकार अधिकार हिरावत आहे. जर कुठल्याही सरकारचे अधिकार हिरावले जात असतील तर विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक