शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

यंदा महिला खासदारांचा टक्का वाढेल? प्रमुख राजकीय पक्षांतर्फे मातब्बर महिला उमेदवार रिंगणात

By किरण अग्रवाल | Updated: May 29, 2024 13:07 IST

लोकसभेत जाणाऱ्या महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे

किरण अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची (झारखंड): आदिवासीबहुल असलेल्या झारखंडमध्ये यंदा खासदारकीसाठी आमदार ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात रिंगणात आहेत, त्याचप्रमाणे प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांनाही उमेदवारीची संधी दिली आहे. त्यामुळे येथून लोकसभेत जाणाऱ्या महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. अन्नपूर्णा देवी, गीता कोडा व जोबा मांझी,  यशस्विनी, अनुपमा सिंह, राजदच्या ममता भुईया, ‘’बसपा’’च्या सावित्रीदेवी आदी प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांचे भाग्य मत यंत्रात बंद झाले आहे. उर्वरित ३ जागांसाठी आणखी एका चरणात जेथे मतदान होणे बाकी आहे, तेथे झामूमो नेते शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाई, भाजपा उमेदवार सीता सोरेन निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ठळक नोंदी...

  • गेल्या वेळी झारखंडमधून सर्वाधिक २५ महिला निवडणूक रिंगणात होत्या, त्यातील भाजपाच्या अन्नपूर्णादेवी व काँग्रेसच्या गीता कोडा या जिंकल्या.
  • यंदा भाजपाने तीन, काँग्रेसने दोन तर झामुमो व ‘’राजद’’ने प्रत्येकी एकेका महिलेस संधी दिली आहे. ‘’झापा’’नेही महिलांना रिंगणात उतरविले आहे. 
  • कोडा यांनी काँग्रेसमधून व सोरेन यांनी झामुमोमधून भाजपात, तर भुईया यांनी भाजपा सोडून ‘’राजद’’मध्ये येऊन उमेदवारी मिळविली आहे. 
  • सिंहभूममध्ये कोडा व मांझी या दोन प्रमुख पक्षीय महिला उमेदवारातच मुख्यत्वे लढत झाली आहे. 
  • खुंटी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या अडचणीत ‘’झापा’’च्या अर्पणा हंस व भारत आदिवासी पार्टीच्या बबिता कश्यप या महिला प्रतिस्पर्ध्यांनी भर घातली आहे.

इतिहास घडणार?

१४ पैकी रांची, राजमहल, गिरीडीह, दुमका व गोड्डा या पाच मतदारसंघातून आजवर कोणीही महिला निवडून जाऊ शकलेली नाही. यंदा रांचीतून काँग्रेसच्या यशस्विनी सहाय, तर दुमकामधून भाजपाच्या सीता सोरेन या दोन मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने यातील कुणाला आपल्या मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार होऊन इतिहास घडविण्याचा मान लाभतो हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे.

५ वेळा महिला खासदार...

  • एकीकृत राज्य असताना पलामू व धनबाद या २ मतदारसंघातून आतापर्यंत ५ वेळा महिला खासदार निवडून गेल्या आहेत. 
  • पलामूमधून कमला कुमारी व धनबादमधून रिता वर्मा यांनी सर्वाधिक प्रत्येकी चार वेळा विजय मिळवून विक्रम नोंदविला आहे. 

राज्य निर्मितीनंतर चारच महिला खासदार...

स्वतंत्र झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर महिला उमेदवारांचे निवडणुकीतील प्रमाण वाढले असले तरी सुशीला केरकेट्टा, सुमन महतो, अन्नपूर्णा देवी व गीता कोडा या चारच महिला निवडून गेल्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४JharkhandझारखंडWomenमहिलाMember of parliamentखासदार