शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 22:42 IST

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे...

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अंतिम सामन्याच्या ठिकाणावर प्रश्न उपस्थित करत, हा सामना कोलकाता अथवा मुंबईत झाला असता, तर भारत जिंकला असता, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

ही निवडणूक नाही, खेळ आहे -यासंदर्भात बोलताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, - "ममता बॅनर्जी घाणेरडे राजकारण करत आहेत, याचे मला वाईट वाटते. आमच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत 11 पैकी 10 सामने जिंकले. ही निवडणूक नाही, खेळ आहे. आता पक्ष आणि राज्यांच्या नावावर विभाजन केले जात आहे. गुजरातमध्ये सामना खेळवला गेला, म्हणून तेथील लोक वाईट आहेत, अशी ममता बॅनर्जींची मानसिकता आहे. भगव्या रंगाचे कपडे परिधान केले म्हणून आपला पराभव झाल्याचे ममता म्हणत आहेत. भगवा रंग तर आपल्या ध्वजातही आहे, आता काय भारताच्या ध्वजातूनही रंग काढणार का?"

भाजप सरचिटणीस तथा आमदार अग्निमित्रा पॉल यांनीही ममतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींसारख्या नेत्यांकडूनच अशा गलिच्छ राजकारणाची अपेक्षा केली जाऊ शकते. या नेत्यांनी भारतीय संघाच्या प्रयत्नांचा अवमान केला आहे. भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकले. त्यांच्या प्रयत्नांचे काय? त्याही त्याच काँग्रेसचा भाग होत्या, हे ममता विसरत आहेत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप