शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आसामात चहा उत्पादन घटल्याने किमती वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

पुढील काही आठवड्यांत सरासरी पावसाची अपेक्षा आहे; परंतु चहाच्या झुडपांना उन्हाळ्यात पावसाळ्याच्या आगमनापर्यंत स्थिर पाऊस पडणे आवश्यक असते.

नवी दिल्ली : मान्सूनपूर्व वादळामुळे आसाममधील चहाच्या उत्पादनात १५ टक्क्यांची घट झाल्यामुळे चहाचे दर  वाढण्याची शक्यता आहे.मान्सूनपूर्व अवकाळी पावसाबरोबरच कोरोना संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने वाहतुकीचे संकट आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहा उद्योगांसमोर निर्माण केले आहे. मंदी आणि लॉकडाऊन यामुळे कर्मचारी रजेवर आहेत. चहा मळ्यांच्या ठिकाणी वाढत असलेले कोरोना संक्रमण व आता खराब हवामान असा दुहेरी मार चहा व्यवसायाला बसत आहे. लिलाव प्रक्रियेत आलेली शिथिलता व वितरणात आलेली समस्या यामुळे चहा उद्योगावर दूरगामी व अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे.  टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएआय) सरचिटणीस प्रबीर भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘आम्ही यावर्षी नव्याने सुरुवात होण्याची अपेक्षा केली होती. तथापि, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ही शक्यता कमजोर झाली आहे.’ टी बोर्ड इंडियाच्या आकडेवारीनुसार, मार्च आणि एप्रिलमध्ये आसाममधील उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मार्च २०१९ च्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी कमी आहे. पुढील काही आठवड्यांत सरासरी पावसाची अपेक्षा आहे; परंतु चहाच्या झुडपांना उन्हाळ्यात पावसाळ्याच्या आगमनापर्यंत स्थिर पाऊस पडणे आवश्यक असते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भारताने स्थिर मान्सूनचा अखेरचा अनुभव  १९९६ ते १९९८ च्या दरम्यान सलग तीन वर्षे घेतला होता.  

टॅग्स :Assamआसाम