शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून उभे राहणार?, दक्षिणेत काँग्रेसला बळकटी आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:45 IST

वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे.

- पोपट पवारतिरूवनंतपुरम : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणुकीच्या मैदानात उतरावे, या मागणीला जोर धरत असून, राहुल यांनी वायनाडची निवड केल्यास काँग्रेसचा दक्षिणेत प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे. यासाठीच राहुल यांना दक्षिणेच्या मैदानावर आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.राहुल गांधी यांनी याबाबत अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. नरेंद्र मोदी यांनी २0१४ साली वाराणसी व वडोदरामधून निवडणूक लढविली होती. भाजपासाठी हा निर्णय फायद्याचा ठरला होता. त्यामुळे केरळ काँग्रेसने राहुल यांना गळ घातली आहे. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोळीकोड (कालिकत), वायनाड आणि मलप्पूरम या तीन जिल्ह्यांतील सात विधानसभा मतदारसंघ त्यात येतात.येथील ९३.१५ टक्के जनता ग्रामीण, तर ६.८५ टक्के जनता शहरी आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. काँग्रेसच्या एम. आय. शनवास २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा जिंकली आहे.गांधी कुटुंबीयांचा दक्षिणेवर विश्वासगांधी घराण्याने याआधी कर्नाटकातील बेल्लारी, चिकमंगलूर आणि आंध्रमधील मेडक मतदारसंघांतून दिल्ली गाठली आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये चिकमंगलूर, तर सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये बेल्लारी येथून निवडणूक लढविली होती. राहुल यांनी वायनाड मतदारसंघाची निवड केली तरी दक्षिणेतील स्वारी त्यांच्यासाठी नवी नसेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक