शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून उभे राहणार?, दक्षिणेत काँग्रेसला बळकटी आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:45 IST

वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे.

- पोपट पवारतिरूवनंतपुरम : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणुकीच्या मैदानात उतरावे, या मागणीला जोर धरत असून, राहुल यांनी वायनाडची निवड केल्यास काँग्रेसचा दक्षिणेत प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे. यासाठीच राहुल यांना दक्षिणेच्या मैदानावर आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.राहुल गांधी यांनी याबाबत अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. नरेंद्र मोदी यांनी २0१४ साली वाराणसी व वडोदरामधून निवडणूक लढविली होती. भाजपासाठी हा निर्णय फायद्याचा ठरला होता. त्यामुळे केरळ काँग्रेसने राहुल यांना गळ घातली आहे. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोळीकोड (कालिकत), वायनाड आणि मलप्पूरम या तीन जिल्ह्यांतील सात विधानसभा मतदारसंघ त्यात येतात.येथील ९३.१५ टक्के जनता ग्रामीण, तर ६.८५ टक्के जनता शहरी आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. काँग्रेसच्या एम. आय. शनवास २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा जिंकली आहे.गांधी कुटुंबीयांचा दक्षिणेवर विश्वासगांधी घराण्याने याआधी कर्नाटकातील बेल्लारी, चिकमंगलूर आणि आंध्रमधील मेडक मतदारसंघांतून दिल्ली गाठली आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये चिकमंगलूर, तर सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये बेल्लारी येथून निवडणूक लढविली होती. राहुल यांनी वायनाड मतदारसंघाची निवड केली तरी दक्षिणेतील स्वारी त्यांच्यासाठी नवी नसेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक