शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:46 AM

देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे.

नवी दिल्ली : देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे. लोकसहभागातूनच विकास साधता येतो. त्यामुळे न्यू इंडियासाठी ‘टीम इंडिया’ने एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणानंतरच्या भाषणात केले. आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी कट्टरतावाद्यांना दिला.संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचा उत्सवही साजरा करत आहे. सुदर्शन चक्रधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे, असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वा कोटी देशवासीयांतर्फे पंतप्रधान मोदी यांनी नमन केले.१९४२ ते १९४७ या काळात स्वातंत्र्यासाठी भारताने एकीचे बळ दाखवले. त्याचप्रकारे आता नवीन भारत साकारण्यासाठी पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सर्वांनी एकत्र यायचे आहे. एकी हीच आपली खरी ताकद आहे. देशात कुणीही मोठे किंवा लहान नसून सर्व समान आहेत. याच समानतेतून, सकारात्मक विचारातून देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.>चार वर्षांतंील छोटे भाषणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केलेले भाषण चार वर्षांतील सर्वात छोटे म्हणजे ५४ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये बोलताना स्वातंत्र्य दिनाची भाषणे खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रे मिळाल्याचे सांगितले होते. या वेळी स्वातंत्र्यदिनी होणारे भाषण छोटे असेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.‘गाली से ना गोली से, परिवर्तनहोगा कश्मिरी को गले लगाने से’या वेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही मोदींनी आपली भूमिका मांडली. ‘न गाली से, न गोली से... परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से’, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.>ध्वजवंदनानंतर विद्यार्थिनीवर बलात्कारचंदिगढ : स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावरून परतत असतानाएका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना चंदिगढमध्ये घडली आहे. - वृत्त/७