शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:04 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही.

नवी दिल्ली : अतिरेक्यांना समर्थन देणे बंद करा, अशा शब्दांत भारताने ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) फटकारले आहे. फुटीरवादी नेता यासीन मलिकला झालेली जन्मठेपेची शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत ओआयसीने व्यक्त केले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ओआयसीने दहशतवादाला आता कोणत्याही प्रकारे योग्य ठरविण्याचा प्रयत्न करू नये. यासीन मलिकप्रकरणी भारतावर टीका करणे म्हणजे यासीन मलिकच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखे आहे. यासीन मलिकविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

२५ मे रोजी यासीन मलिकला दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. २०१६ मध्ये काश्मिरात हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका एनआयएने यासीन मलिकवर ठेवला होता. या प्रकरणी एनआयएने त्याच्या घरावर छापे घातले होते. त्यात काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती.

काय म्हटले होते ओआयसीने?

ओआयसीने मलिक याच्या शिक्षेबाबत बोलताना म्हटले हाेते की, मलिकला अमानवीय पद्धतीने अटक करण्यात आली. काश्मिरातील अल्पसंख्याकांवरील छळ यातून दिसतो.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत