शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:04 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही.

नवी दिल्ली : अतिरेक्यांना समर्थन देणे बंद करा, अशा शब्दांत भारताने ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) फटकारले आहे. फुटीरवादी नेता यासीन मलिकला झालेली जन्मठेपेची शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत ओआयसीने व्यक्त केले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ओआयसीने दहशतवादाला आता कोणत्याही प्रकारे योग्य ठरविण्याचा प्रयत्न करू नये. यासीन मलिकप्रकरणी भारतावर टीका करणे म्हणजे यासीन मलिकच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखे आहे. यासीन मलिकविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

२५ मे रोजी यासीन मलिकला दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. २०१६ मध्ये काश्मिरात हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका एनआयएने यासीन मलिकवर ठेवला होता. या प्रकरणी एनआयएने त्याच्या घरावर छापे घातले होते. त्यात काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती.

काय म्हटले होते ओआयसीने?

ओआयसीने मलिक याच्या शिक्षेबाबत बोलताना म्हटले हाेते की, मलिकला अमानवीय पद्धतीने अटक करण्यात आली. काश्मिरातील अल्पसंख्याकांवरील छळ यातून दिसतो.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत