शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:04 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही.

नवी दिल्ली : अतिरेक्यांना समर्थन देणे बंद करा, अशा शब्दांत भारताने ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) फटकारले आहे. फुटीरवादी नेता यासीन मलिकला झालेली जन्मठेपेची शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत ओआयसीने व्यक्त केले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ओआयसीने दहशतवादाला आता कोणत्याही प्रकारे योग्य ठरविण्याचा प्रयत्न करू नये. यासीन मलिकप्रकरणी भारतावर टीका करणे म्हणजे यासीन मलिकच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखे आहे. यासीन मलिकविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

२५ मे रोजी यासीन मलिकला दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. २०१६ मध्ये काश्मिरात हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका एनआयएने यासीन मलिकवर ठेवला होता. या प्रकरणी एनआयएने त्याच्या घरावर छापे घातले होते. त्यात काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती.

काय म्हटले होते ओआयसीने?

ओआयसीने मलिक याच्या शिक्षेबाबत बोलताना म्हटले हाेते की, मलिकला अमानवीय पद्धतीने अटक करण्यात आली. काश्मिरातील अल्पसंख्याकांवरील छळ यातून दिसतो.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत