शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

भारत-पाकिस्तानच्या चर्चेत तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही : शिवराजसिंह चौहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:44 IST

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

गुवाहाटी : भारत-पाकिस्तानच्या वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले. 

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गुवाहाटी येथे बांधलेल्या घरांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र कोणी कुरापत काढली तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाई करताना पाकिस्तानी नागरिक किंवा त्यांच्या लष्कराला लक्ष्य न करता फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (वृत्तसंस्था)

आम्हाला युद्ध नको...पाकिस्तानने केलेला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा माराही भारताने निष्फळ ठरविला. भारताला युद्ध नको आहे, मात्र आम्ही दहशतवादी कारवाया अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला रोखणे व पाकव्याप्त काश्मीर या दोन मुद्द्यांवरच भारताची पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते.

‘ऑपरेशन सिंदूरबाबत संभ्रम निर्माण करू नका’भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानिमित्त उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. त्यात नक्वी सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी, त्यांना समर्थन देणाऱ्यांना  धडा शिकवला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान