शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

भारत-पाकिस्तानच्या चर्चेत तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही : शिवराजसिंह चौहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:44 IST

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

गुवाहाटी : भारत-पाकिस्तानच्या वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले. 

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गुवाहाटी येथे बांधलेल्या घरांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र कोणी कुरापत काढली तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाई करताना पाकिस्तानी नागरिक किंवा त्यांच्या लष्कराला लक्ष्य न करता फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (वृत्तसंस्था)

आम्हाला युद्ध नको...पाकिस्तानने केलेला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा माराही भारताने निष्फळ ठरविला. भारताला युद्ध नको आहे, मात्र आम्ही दहशतवादी कारवाया अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला रोखणे व पाकव्याप्त काश्मीर या दोन मुद्द्यांवरच भारताची पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते.

‘ऑपरेशन सिंदूरबाबत संभ्रम निर्माण करू नका’भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानिमित्त उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. त्यात नक्वी सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी, त्यांना समर्थन देणाऱ्यांना  धडा शिकवला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान