शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

भारत-पाकिस्तानच्या चर्चेत तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही : शिवराजसिंह चौहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:44 IST

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

गुवाहाटी : भारत-पाकिस्तानच्या वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करू देणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले. 

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताने अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असेही ते म्हणाले. 

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गुवाहाटी येथे बांधलेल्या घरांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र कोणी कुरापत काढली तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाई करताना पाकिस्तानी नागरिक किंवा त्यांच्या लष्कराला लक्ष्य न करता फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (वृत्तसंस्था)

आम्हाला युद्ध नको...पाकिस्तानने केलेला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा माराही भारताने निष्फळ ठरविला. भारताला युद्ध नको आहे, मात्र आम्ही दहशतवादी कारवाया अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला रोखणे व पाकव्याप्त काश्मीर या दोन मुद्द्यांवरच भारताची पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते.

‘ऑपरेशन सिंदूरबाबत संभ्रम निर्माण करू नका’भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानिमित्त उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. त्यात नक्वी सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी, त्यांना समर्थन देणाऱ्यांना  धडा शिकवला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान