शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

'देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यावेत?

By महेश गलांडे | Updated: February 8, 2021 16:05 IST

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या

ठळक मुद्दे सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. तसेच, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच असून शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. त्यानंतर, काँग्रेसनेही मोदींवर टीका केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या, असे म्हणत पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर का आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी विचारला आहे. सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

1. मोदी सरकारने सत्तेवर विराजमान होताच 12 जून 2014 रोजी राज्यांद्वारे आधारभूत किंमतीवर अधिकतम देण्यात येणाऱ्या 150 रुपयांचा बोनस आपण बंद केला, हे खरं नाही का? 2. डिसेंबर 2014 मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या भूमी अधिग्रहनसाठी योग्य दाम देणाऱ्या कायद्याला एकापाठोपाठ एक असे तीन अध्यादेश आणून भांडवलदारांच्या हितासाठी बदलण्याचा प्रयत्न केला, हे खरं नाही का?3. फेब्रुवारी 2015 मध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्क्यापेंक्षा अधिक किमान आधारभूत किंमत दिल्यास बाजारात विसंगती येईल, असं सांगितलं, हे खरं नाही का? याचाच अर्थ तुम्ही भांडवलदाराच्या बाजूने उभे होतात. 4.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून 2016 पासून 2019 पर्यंत खासगी कंपनींना 26,000 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यात आला, हे खरं नाही का? अन्यथा तो पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असता. 5. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिल्याचं ढोल वाजवून सांगत आहात. पण, दुसरीकडे 15,000 प्रति हेक्टर शेतीवर टॅक्स लावण्यात आलाय. त्याचं काय?6. गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदाच शेतीवर टॅक्स लागलाय, हे खरं नाही का?. खतांवर 5 टक्के आणि किटकनाशक, औषधांपासून ते कृषी यंत्रावर 12 टक्के ते 18 टक्के टॅक्स लावण्यात आलाय. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाल यांनी ट्विट करुन प्रश्नांची मालिकाच जनतेसमोर ठेवली आहे. या प्रश्नातून मोदींना सवाल करण्यात आला आहे. मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणानंतरची ही काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्येही हॅशटॅग असे लिहिले आहे.  

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन