शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

'देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यावेत?

By महेश गलांडे | Updated: February 8, 2021 16:05 IST

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या

ठळक मुद्दे सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. तसेच, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच असून शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. त्यानंतर, काँग्रेसनेही मोदींवर टीका केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या, असे म्हणत पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर का आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी विचारला आहे. सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

1. मोदी सरकारने सत्तेवर विराजमान होताच 12 जून 2014 रोजी राज्यांद्वारे आधारभूत किंमतीवर अधिकतम देण्यात येणाऱ्या 150 रुपयांचा बोनस आपण बंद केला, हे खरं नाही का? 2. डिसेंबर 2014 मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या भूमी अधिग्रहनसाठी योग्य दाम देणाऱ्या कायद्याला एकापाठोपाठ एक असे तीन अध्यादेश आणून भांडवलदारांच्या हितासाठी बदलण्याचा प्रयत्न केला, हे खरं नाही का?3. फेब्रुवारी 2015 मध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्क्यापेंक्षा अधिक किमान आधारभूत किंमत दिल्यास बाजारात विसंगती येईल, असं सांगितलं, हे खरं नाही का? याचाच अर्थ तुम्ही भांडवलदाराच्या बाजूने उभे होतात. 4.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून 2016 पासून 2019 पर्यंत खासगी कंपनींना 26,000 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यात आला, हे खरं नाही का? अन्यथा तो पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असता. 5. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिल्याचं ढोल वाजवून सांगत आहात. पण, दुसरीकडे 15,000 प्रति हेक्टर शेतीवर टॅक्स लावण्यात आलाय. त्याचं काय?6. गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदाच शेतीवर टॅक्स लागलाय, हे खरं नाही का?. खतांवर 5 टक्के आणि किटकनाशक, औषधांपासून ते कृषी यंत्रावर 12 टक्के ते 18 टक्के टॅक्स लावण्यात आलाय. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाल यांनी ट्विट करुन प्रश्नांची मालिकाच जनतेसमोर ठेवली आहे. या प्रश्नातून मोदींना सवाल करण्यात आला आहे. मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणानंतरची ही काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्येही हॅशटॅग असे लिहिले आहे.  

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन