शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 19:51 IST

'तेच वक्तव्य एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर त्याला गोळ्या घातल्या असत्या.'

अलिगढ:उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. अलीगढमधील 'शोषित वंचित समाज संमेलना'ला संबोधित करताना ओवेसी यांनी कंगना राणौतच्या 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या कथित वक्तव्यावर निशाणा साधला.

असदुद्दीन औवेसी म्हणाले, 'मला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये? कंगनाने बोललेले वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर त्याला गोळ्या घातल्या असत्या. कंगनाच्या वक्तव्याला आता मोदी-योगी देशद्रोह मानणार का?' यावेळी त्यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत, हिंदू मत भाजपचे झाले, त्यांच्यासाठी मुस्लिम मताला किंमत नाही, असं म्हणाले.

गृहमंत्री शहांवर साधला निशाणा

यावेळी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत औवेसी म्हणाले, 'अमित शाह मुस्लिमांचे नाव घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. आझम खान आठवतात तर अमित शहांना कासगंजचा अल्ताफ का आठवत नाही? ते हिंदू असते तर योगी आदित्यनाथ लगेच पोहोचले असते. पोलिसांचे निलंबन झाले पण त्यांच्यावर खुनाचा खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी