शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 19:51 IST

'तेच वक्तव्य एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर त्याला गोळ्या घातल्या असत्या.'

अलिगढ:उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. अलीगढमधील 'शोषित वंचित समाज संमेलना'ला संबोधित करताना ओवेसी यांनी कंगना राणौतच्या 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या कथित वक्तव्यावर निशाणा साधला.

असदुद्दीन औवेसी म्हणाले, 'मला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये? कंगनाने बोललेले वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर त्याला गोळ्या घातल्या असत्या. कंगनाच्या वक्तव्याला आता मोदी-योगी देशद्रोह मानणार का?' यावेळी त्यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत, हिंदू मत भाजपचे झाले, त्यांच्यासाठी मुस्लिम मताला किंमत नाही, असं म्हणाले.

गृहमंत्री शहांवर साधला निशाणा

यावेळी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत औवेसी म्हणाले, 'अमित शाह मुस्लिमांचे नाव घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. आझम खान आठवतात तर अमित शहांना कासगंजचा अल्ताफ का आठवत नाही? ते हिंदू असते तर योगी आदित्यनाथ लगेच पोहोचले असते. पोलिसांचे निलंबन झाले पण त्यांच्यावर खुनाचा खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी