शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 13:26 IST

एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले

बॉलीवुड बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासूनच, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात मलिक विरुद्ध वानखेडे, असे चित्रही पाहायला मिळाले. मलिकांच्या आरोपांनंतर आता एनसीबीने (NCB) मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी 5 केसेसचा तपास काढून घेतला आहे. (Sameer Khan's case handed over to Delhi NCB team). त्यामध्ये, मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. 

एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. मंत्री नवाब मलिक सातत्याने अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ले चढवत असल्याने पुढील राजकीय वादाला तोंड फुटणार हे जवळपास निश्चित आहे. जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय पहिल्यांदा गेल्या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता, अशी बातमीही एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले. एनसीबीला २० हजार रुपये किमतीच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिकांचा जावई समीर खानला एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटकही झाली होती. समीर खान यांच्याकडे तब्बल २०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज होते, असे तपास यंत्रणांनी सांगितले होते. परंतु मलिक यांनी “हर्बल तंबाखू” असल्याचा दावा केला आणि सप्टेंबरमध्ये समीर खान यांचा जामीन मंजूर करण्यात आला. आता, एसआयटीकडून या जामीनंसदर्भात वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा एसआयटीचा विचार आहे. 

नवाब मलिक यांनी ट्विट करुन समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्याचे सांगितले आहे. “समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह 5 खटले मागे घेण्यात आले आहेत. अशी 26 प्रकरणे आहेत, ज्यांची चौकशी आवश्यक आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.”, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. दरम्यान, एनसीबीचे एक पथक या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्यासाठी शनिवारी मुंबईत पोहोचेल. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCrime Newsगुन्हेगारीSameer Wankhedeसमीर वानखेडे