शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 13:26 IST

एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले

बॉलीवुड बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासूनच, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात मलिक विरुद्ध वानखेडे, असे चित्रही पाहायला मिळाले. मलिकांच्या आरोपांनंतर आता एनसीबीने (NCB) मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी 5 केसेसचा तपास काढून घेतला आहे. (Sameer Khan's case handed over to Delhi NCB team). त्यामध्ये, मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. 

एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. मंत्री नवाब मलिक सातत्याने अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ले चढवत असल्याने पुढील राजकीय वादाला तोंड फुटणार हे जवळपास निश्चित आहे. जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय पहिल्यांदा गेल्या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता, अशी बातमीही एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले. एनसीबीला २० हजार रुपये किमतीच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिकांचा जावई समीर खानला एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटकही झाली होती. समीर खान यांच्याकडे तब्बल २०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज होते, असे तपास यंत्रणांनी सांगितले होते. परंतु मलिक यांनी “हर्बल तंबाखू” असल्याचा दावा केला आणि सप्टेंबरमध्ये समीर खान यांचा जामीन मंजूर करण्यात आला. आता, एसआयटीकडून या जामीनंसदर्भात वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा एसआयटीचा विचार आहे. 

नवाब मलिक यांनी ट्विट करुन समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्याचे सांगितले आहे. “समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह 5 खटले मागे घेण्यात आले आहेत. अशी 26 प्रकरणे आहेत, ज्यांची चौकशी आवश्यक आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.”, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. दरम्यान, एनसीबीचे एक पथक या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्यासाठी शनिवारी मुंबईत पोहोचेल. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCrime Newsगुन्हेगारीSameer Wankhedeसमीर वानखेडे