शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

Maharashtra Election : काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यासंदर्भात काँग्रेसने व्यैयक्तिक सुनावणीची मागणीही केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील मतदारांच्या डेटावर एका माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनीही प्रश्न उपस्थित केल्याचेही," काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "मनमानी पद्दतीने हटविण्याच्या आणि जोडण्याच्या या प्रक्रियेत जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 47 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. 50 विधानसभा मतदारसंघांपैकी जेथे सरासरी 50,000 नवीन मतदार जोडले गेले, तेथे सत्ताधारी आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 47 जागा जिंकल्या आहेत."

मतदानाचा टक्का अचानक वाढल्यावर प्रश्नचिन्ह -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने म्हटले आहे की, "21 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 58.22% होती, जी रात्री 11:30 पर्यंत 65.02% झाली. तसेच, अंतिम अहवालात 66.05% मतदानाची नोंद झाली." या पत्रानुसार, केवळ एका तासात म्हणजे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अंदाजे 76 लाख मतदान झाले आहे.

ईव्हीएमवरही आक्षेप - ईव्हीएमसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. "आम्हाला ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवे आहेत," असे खर्गे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४