शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शाळा भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार: केंद्र सरकार; आरोग्यसुरक्षा महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 07:25 IST

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे  तिथे शारीरिक अंतर कमी होते.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी होऊ लागली असली तरी शाळा पुन्हा सुरू होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनाच आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण त्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नाही, असे तज्ज्ञांचे मत असून त्यांच्याच सल्ल्याने सरकार शाळांसंदर्भात निर्णय घेईल. 

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे तिथे शारीरिक अंतर कमी होते. संशोधनातून जसजशी नवी माहिती उजेडात येईल व दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढेल, त्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र कदाचित विचार करू शकते. अर्थात तो निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. ते म्हणाले, काही देशांत कोरोना साथीमध्ये बंद केलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र त्यानंतर अशी स्थिती उद्भवली की, या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जोपर्यंत साथीचे पूर्णपणे निर्मूलन होत नाही तोपर्यंत या विषयाबाबत कोणतीही जोखीम पत्करणे योग्य ठरणार नाही. 

मुलांसाठी उपचारांची वेगळी व्यवस्थाn नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या प्रौढ व्यक्ती व लहान मुलांची संख्या जवळजवळ सारखीच होती. n भविष्यात आवश्यकता वाटली तर कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल. n लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्यास शासकीय व खासगी रुग्णालये ऑक्सिजनपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नीट पार पाडतील.सर्व प्रकारची सावधगिरी n कोरोना साथीबाबत केंद्र सरकारच्या प्रमुख सल्लागारांमध्ये डॉ. व्ही. के. पॉल यांचा समावेश आहे. n त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गापासून लहान मुलांचे आता संरक्षण होऊ लागले आहे. n मात्र, या विषाणूने जर दुसरे रूप धारण केले तर त्यामुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. n तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नाही असे वाटत असले तरी केंद्र सरकार सर्व प्रकारची सावधगिरी बाळगत आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या