शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार; हवामान खात्याचा सुखद अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:51 IST

यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याचा पहिला अंदाज

मुंबई: यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी आहे. यंदा निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्यानं व्यक्त केलेला हा पहिला अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होईल. या कालावधीत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.भारतीय हवामान खात्यासोबतच बहुतांश इतर संस्थांनीदेखील यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पॅसिफिक महासागरातील ला निनोचा प्रभाव कमी होईल, अशी शक्यता जगातल्या काही संस्थांनी वर्तवली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचा भारतातल्या मान्सूनवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानावर हवामान विभागानं लक्ष ठेवून असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.

टॅग्स :Rainपाऊस