शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 06:23 IST

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात २०१४ पासून मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला झाला, तर ती युद्ध पुकारल्याची कृती मानली जाऊन प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तानला दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात २०१४ पासून मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसारच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर पाकने भारताच्या उत्तर व पश्चिम सीमांवर लष्करी तळासह नागरी भागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने त्याला प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका

पहलगामप्रमाणेच पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी गटांनी भारतात हल्ला केला, तर त्याचा प्रतिकार करू, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनCentral Governmentकेंद्र सरकारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक