शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवण्यासाठी मोदी सरकारची डोकेबाज (ध)रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 14:55 IST

फाळणीच्यावेळी भारताच्या वाट्याला तीन नद्या आल्या. मात्र, तेव्हापासून भारताने आपल्या हिश्श्याचे पाणी पूर्णपणे कधीच वापरले नव्हते.

रोहतक: मोदी सरकारकडून लवकरच उत्तराखंडमधील तीन नद्यांवर धरणे बांधून पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यात येणार आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते मंगळवारी हरियाणाच्या रोहतक येथील कृषी मेळाव्यात बोलत होते.यावेळी गडकरी यांनी म्हटले की, उत्तराखंडमधून वाहणाऱ्या या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला द्यायचे की नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. परंतु, सध्या आपल्या विकासासाठी गरजेचे असलेले या नद्यांतील पाणीही पाकिस्तानात जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाणी धरणांद्वारे रोखून ते पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये वळवण्याचा निर्णय घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या या विधानाचे उपस्थित शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. फाळणीच्यावेळी भारताच्या वाट्याला तीन नद्या आल्या. मात्र, तेव्हापासून भारताने आपल्या हिश्श्याचे पाणी पूर्णपणे कधीच वापरले नव्हते. त्यामुळे आता सरकारने उत्तराखंडमध्ये तीन धरणे बांधून भारताच्या हिश्श्याचे पाणी अडवायचे ठरवले आहे. हे पाणी यमुना नदीतून हरियाणा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांपर्यंत पोहोचवले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला हे उद्दिष्ट काही करून साध्य करायचे आहे. त्यामुळे या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीPakistanपाकिस्तानNitin Gadkariनितीन गडकरीriverनदी