शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:04 IST

Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. हे निकाल आम आदमी पक्षाला धक्का देणार आहेत. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत 'आप'ला २३ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ४७ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. अशातच, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

नवी दिल्ली जागेची 'जादू' -महत्वाचे म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्ली जागेवर ज्या उमेदवाराचा विजय झाला, तोच उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. २०१३ मध्ये त्यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. याच जागेवरून शीला दीक्षितही एकदा निवडून आल्या होत्या. यापूर्वी त्या गोल मार्केट मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या होत्या. २००८ मध्ये सीमांकनानंतर गोल मार्केट जागेचे नाव बदलून नवी दिल्ली, असे करण्यात आले. 

प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट -प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली, असे मानले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.

प्रवेश वर्मा यांनी आपल्या विजयानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जय श्री राम लिहिले आहे. तसेच, "दिल्लीत हे जे सरकार येत आहे, ते पंतप्रधानांचे व्हिजन घेऊन येत आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. दिल्लीतील जनतेचा विजय आहे," असेही वर्मा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टी