शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:04 IST

Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. हे निकाल आम आदमी पक्षाला धक्का देणार आहेत. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत 'आप'ला २३ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ४७ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. अशातच, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

नवी दिल्ली जागेची 'जादू' -महत्वाचे म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्ली जागेवर ज्या उमेदवाराचा विजय झाला, तोच उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. २०१३ मध्ये त्यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. याच जागेवरून शीला दीक्षितही एकदा निवडून आल्या होत्या. यापूर्वी त्या गोल मार्केट मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या होत्या. २००८ मध्ये सीमांकनानंतर गोल मार्केट जागेचे नाव बदलून नवी दिल्ली, असे करण्यात आले. 

प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट -प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली, असे मानले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.

प्रवेश वर्मा यांनी आपल्या विजयानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जय श्री राम लिहिले आहे. तसेच, "दिल्लीत हे जे सरकार येत आहे, ते पंतप्रधानांचे व्हिजन घेऊन येत आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. दिल्लीतील जनतेचा विजय आहे," असेही वर्मा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टी