शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:18 IST

Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे.

दिल्लीत आपचे पतन होताच आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. यामुळे आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. यावरून भाजपाच्या आमदारांनी मोठा दावा केला आहे. 

दिल्लीत सरकार गेल्यानंतर आता आपची ताकद पंजाबमध्येच राहिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केजरीवाल हे पंजाबमध्ये लक्ष घालू शकतात असे म्हटले होते. आपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत. यामुळे आपमध्ये येत्या काळात फेरबदल होताना दिसू शकतो किंवा मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी केली जाऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला होता. 

यानंतर ही घडामोड घडत आहे. केजरीवाल लुधियानातून पोटनिवडणूक लढू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एका आमदाराच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. अशातच भाजप आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री भगवंत मान यांना अयोग्य घोषित करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू शकतात, असे यात म्हटले आहे. 

महिलांना १००० रुपये देण्याचा वादा पूर्ण करण्यात मान अपयशी आहेत, नशेबाजी रोखण्यास अपयशी ठरले आहेत. तसेच पंजाबची परिस्थिती आणखी खराब केली आहे. आता या साऱ्या गोष्टी ते मान यांच्यावर लादणार आहेत. केजरीवाल एक चांगला माणूस असल्याचे आपच्या आमदारांना बोलायला भाग पाडले जात आहे. त्यांनाच मुख्यमंत्री केले जावे असेही आमदारांच्या तोंडून वदविले जात असल्याचा दावा सिरसा यांनी केला आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक