बाबो! 5 वर्षात तब्बल 35 वेळा पळून गेली बायको; 2 मुलांना घेऊन नवरा मागतोय भीक, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:51 PM2023-01-11T17:51:54+5:302023-01-11T17:53:01+5:30

गेल्या पाच वर्षात पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

wife who has been absconding 35 times in 5 years | बाबो! 5 वर्षात तब्बल 35 वेळा पळून गेली बायको; 2 मुलांना घेऊन नवरा मागतोय भीक, म्हणतो...

बाबो! 5 वर्षात तब्बल 35 वेळा पळून गेली बायको; 2 मुलांना घेऊन नवरा मागतोय भीक, म्हणतो...

googlenewsNext

देशात अनेक धक्कादायक घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक पती आपल्या पत्नीमुळे फास त्रस्त झाला आहे. गेल्या पाच वर्षात त्याची पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. मात्र तरीही त्याचे पत्नीवरील प्रेम कमी झालेले नाही. पत्नीला शोधण्यासाठी मदत करा असं म्हणत आहे. याचना करत आहे. हे प्रकरण रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारक गावातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन लहान मुलांसह रस्त्यावर भटकणाऱ्या पतीचं नाव कृष्णा मुरारी गुप्ता असं आहे. त्याने आता रामगड पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची नोंद केली आहे. कैमूर येथील रहिवासी असलेल्या कृष्णा मुरारी गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात सांगितले आहे की, त्याच्या पत्नीने त्याला एकदा नव्हे तर 30 ते 35 वेळा सोडले आहे. त्याला दोन मुले असल्याचे तो सांगतो. मोठा मुलगा 4 वर्षांचा आणि मुलगी 4 महिन्यांची आहे. या दोघांची देखभाल करणे कठीण होत आहे. 

पत्नी घरी असताना मी नोकरी करायचो, आता मुलं घेऊन कुठे कामाला जाऊ. भीक मागून जगावे लागते. जर माझी पत्नी परत आली नाही तर मी आत्महत्या करेन असं देखील वैतागलेल्या पतीने म्हटलं आहे. कृष्णा मुरारी गुप्ता आणि त्याची पत्नी कैमूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांनी 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. कृष्णा मुरारी गुप्ता हा जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे आणि त्याची पत्नी नुआव पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे. कृष्णा मुरारी गुप्ता सांगतात की, लग्नाच्या एक वर्षानंतर पत्नी घरातून पळून गेली. ती मला सोडून अनेक वेळा घर सोडून गेली आहे. 

पत्नीमुळे त्रस्त झालेला पती आपल्या दोन निरागस मुलांसह या कडाक्याच्या थंडीत घरोघरी फिरत आहे. पत्नीच्या शोधासाठी रामगड पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. पत्नी हरवल्याचे पोस्टर घेऊन मुलांसह रस्त्यावर फिरत आहे. त्यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. माझी पत्नी सात महिन्यांत अनेक वेळा पळून गेली आहे. मला दोन मुलं आहेत. माझ्या घरात या मुलांना कोणी पाहणार नाही. मला भीक मागायची नाही, पण मुलांच्या भल्यासाठी हे करावे लागतेय. चांगली नोकरी सोडावी लागली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: wife who has been absconding 35 times in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.