शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आई आणि मुलीने केली जावयाची निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:47 IST

बंगळुरुमध्ये एका महिलेने आईच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bengaluru Crime: मेरठच्या मुस्कानने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण देशभरात गाजत आहे. मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला. त्यानंतर अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची आणखी प्रकरण समोर आली आहेत. अशातच बंगुळुरुमध्येही आईच्या मदतीने मुलीने पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर मुलीने पतीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी आणि सासूला अटक केली आहे.

बंगळुरूमध्ये ३७ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक लोकनाथ सिंह याची हत्या आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून व्यावसायिकाची पत्नी आणि सासूने त्याची हत्या केली होती. २२ मार्च रोजी लोकनाथचा मृतदेह चिक्कबनवाडा येथील निर्जन भागात आढळून आला होता. पोलीस तपासात त्याच्या पत्नीने आईच्या मदतीने लोकनाथला संपवल्याचे समोर आलं.

लोकनाथ सिंहची पत्नी आणि सास त्याच्या हत्येसाठी बऱ्याच आधीपासून तयारी करत होते. संधी साधून त्यांनी आधी लोकनाथला जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर कारमध्ये निर्जनस्थळी नेऊन चाकूने त्याचा गळा चिरला. भीतीपोटी त्यांनी मृतदेह कारमध्ये टाकून पळ काढला. पोलिसांना संध्याकाळच्या सुमारास एक मृतदेह सापडल्याचा फोन आला होता. पोलिसांनी १९ वर्षीय यशस्विनी सिंह आणि ३७ वर्षीय हेमाबाई यांना अटक केली आहे. याप्रकरणी सोलादेवनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकनाथ दोन वर्षांपासून यशस्विनीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी डिसेंबरमध्ये कुनिगलमध्ये लग्न केले. मात्र, दोघांच्या वयातील फरकामुळे तिच्या घरच्यांचा या नात्याला होता. लोकनाथ आणि यशस्विनीने लग्न केल्याचे दोघांच्याही कुटुंबियांना माहिती नव्हती. लग्नानंतर  लगेच लोकनाथने यशस्विनीला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडून दिलं होतं. यशस्विनीच्या कुटुंबीयांना दोन आठवड्यांपूर्वीच तिच्या लग्नाची माहिती मिळाली.

त्यानंतर यशस्विनी आणि तिच्या घरच्या मंडळींना त्याच्या विवाहबाह्य संबंधाची आणि अवैध धंद्याच्या माहिती मिळाली. त्यामुळे लोकनाथ आणि यशस्विनीमध्ये भांडणे वाढू लागली. लग्नानंतर जेव्हाही ती लोकनाथच्या शारीरिक मागण्या मान्य करण्यास नकार द्यायची तेव्हा तो तिचा छळ करायचा. लोकनाथने यशस्विनीला तिच्या आईला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगण्यास सांगितले होते. यानंतर लोकनाथ तिला घरी सोडून गेला. मात्र लोकनाथने पुन्हा यशस्विनीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना धमकावले. जर ती त्याच्यासोबत राहायला परत आली नाही तर तो त्यांच्याशी वाईट वागेल असे तो म्हणाला.

कशी केली हत्या?

शनिवारी सकाळी लोकनाथने यशस्विनीला फोन करून तिला भेटायला येत असल्याचे सांगितले होते. सकाळी दहाच्या सुमारास लोकनाथ त्यांच्या एसयूव्हीने घरातून निघाला. त्याने बहिणीला सांगितले की तो बाहेर जात आहे. त्यानंतर यशस्विनी आणि त्याच्या आईने जेवण तयार केलं आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. लोकनाथला यशस्विनीसोबत पार्टी करायची होती, त्यामुळे त्याने बिअरच्या काही बाटल्याही आणल्या होत्या. यशस्विनीला सोबत घेतल्यानंतर लोकनाथ तिला बीजीएस लेआउटमधील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने कारमध्येच बिअर प्यायली. त्यानंतर यशस्विनीने त्याला झोपेच्या गोळ्या असलेलं जेवण खाऊ घातले.

लोकनाथ बेशुद्ध होताच यशस्विनीने तिच्या आईला लोकेशन पाठवले. हेमाबाईने चाकून त्याच्या गळ्यावर दोन वार केले. त्यानंतर शुद्ध आल्याने लोकनाथ घाबरुन पळू लागला आणि आरडाओरडा करु लागला. त्यामुळे दोघीही घाबरल्या आणि त्यांनी पळ काढला. त्यांना गाडीतच मृतदेह सोडायचा होता पण तसं झालं नाही.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस