शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

सीएएसाठी अमित शहा का एवढे प्रयत्नशील होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:50 IST

लक्ष्य पश्चिम बंगाल जिंकण्याचे; हिवाळी अधिवेशनात भाजप, मोदी सरकारचे विधेयक संमतीसाठी अहोरात्र काम

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी संमत करून घेण्यासाठी एवढा जोर का लावला याचे रहस्य उघड होत आहे. संपूर्ण २०१९ वर्ष हे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सरकारसाठी फारच यशस्वी आणि ऐतिहासिक ठरले.अतिशय स्पष्ट बहुमतासह लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सरकारने प्रदीर्घ काळपासून प्रलंबित असलेले तिहेरी तलाकला बंदी घालणारे विधेयक ३१ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संमत केले. नंतर जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा घटनेत दिलेला अनुच्छेद ३७० ५ ऑगस्ट रोजी रद्द केला व तो एक ऐतिहासिक क्षण ठरला. तेव्हापासून संपूर्ण खोरे हे शांत राहिले. जगानेदेखील ही वस्तुस्थिती स्वीकारली. हे एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय, अयोध्येतील राम जन्मभूमीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ९ नोव्हेंबर रोजी एकमताने जन्मभूमीच्या बाजूने आला आणि शतकभरापासून वादग्रस्त बनलेला वाद सुटला.मंत्री अमित शहा हे महत्त्वाकांक्षी बनले होते व त्यांना प्रदीर्घ काळपासून प्रलंबित असलेले नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) विधेयक २०१९ मध्येच संमत करून घ्यायचे होते. सीएएमागे फायद्याचा विचार असा आहे की, २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकणे. अंदाजे ११ कोटी लोकसंख्या आणि सात कोटी मतदार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये गृहमंत्रालयाच्या अंदाजानुसार एक कोटी बेकायदा स्थलांतरित आहेत. या बेकायदा एक कोटी स्थलांतरितांत भाजपच्या अंदाजानुसार जवळपास २५-३० लाख हे मुस्लिमेतर धर्मांचे आहेत. नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा झाल्यामुळे त्यांना मतदार म्हणून पात्रता मिळेल व ७० लाख बेकायदा मुस्लिमांना मतदानाचा लाभ नाकारला जाईल. हे लक्ष्य राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाकांक्षी असून, अमित शहा यांनी त्या विधेयकाचा विचार मांडला तेव्हा भाजपच्या नेतृत्वाला मोठा हर्ष झाला होता. सीएएची जर अंमलबजावणी झाली, तर राज्यातील किमान ९५ विधानसभा मतदारसंघांत त्याचा परिणाम होईल. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सशिपची (एनआरसी) अंमलबजावणी सोडून देण्यात आल्यावरून हे उघड झाले की, एकट्या आसाममध्ये १८ लाख बेकायदा निवासी आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये असे बेकायदा स्थलांतरित एक कोटीच्याही पुढे असतील. या पार्श्वभूमीवर विरोधक विखुरले जात होते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेले पक्ष भाजपला पाठिंबा देत होते. त्यामुळे भाजप आणि सरकारला सीएए संमत व्हायलाच हवा होता.भाषणांसाठी शिकत आहेत बंगाली भाषापश्चिम बंगाल जिंकणे हे अमित शहा यांच्यासाठी त्रिपुरा जिंकण्यापेक्षाही मोठे स्वप्न आहे. सध्या तर शहा हे २०२१ मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचारसभांमध्ये बंगाली भाषेत बोलता यावे म्हणून बंगाली भाषेचे धडेही गिरवत आहेत. यातून भाजपला हेही दाखवायचे आहे की, भाजप हा फक्त हिंदी भाषक राज्यांतीलच पक्ष नाही; परंतु फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर झालेल्या निदर्शनांमुळे उत्साहावर सावट आले असून, आता सगळ्या गोष्टी थांबवल्या गेल्या आहेत.

टॅग्स :Amit Sadhअमित संधcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक