शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:48 IST

दिवाळीतील उलाढालीचा संदर्भ देत मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमताचा आकडा गाठला असला तरी, सरकार स्थापनेला उशीर होत आहे. भाजपा, शिवसेनेनं दबावाचं राजकारण सुरू केल्यानं सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेनेनं संधी साधत भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यात ही परिस्थिती असताना आर्थिक आघाडीवरील चिंताजनक परिस्थितीवरुनही शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकटाच अधिक झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पातळ्यांवरील हा शुकशुकाट एकच सवाल करतो आहे... 'इतना सन्नाटा क्यों है भाई?' असं सामनानं अग्रलेखात म्हटलं आहे.केंद्रातील मायबाप सरकार सांगतं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. शेतकरीही त्यासाठी खूप काबाडकष्ट घेतात, पण मध्येच नैसर्गिक आपत्ती येते आणि कित्येकदा शेतीवर केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न निघत नाही. त्यावर काय उपाय करायचा हे कोणीच सांगत नाही. आज देशभरात आर्थिक मंदी आहे. दिवाळीसाठी म्हणून बाजारपेठेत फटाक्यांबरोबरच खरेदीचा जो धुमधडाका असायला हवा, तो अजूनही दिसत नाही, अशा शब्दांत सामनानं आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकावर निशाणा साधला आहे.वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन पार पडले. पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दोन दिवस आणखी शिल्लक आहेत. मात्र मंदीच्या सावटामुळे 30 ते 40 टक्के खरेदी कमी झाल्याने बाजारपेठांतील रौनकच हरवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कारखानदारी धोक्यात आली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, रोज नवनवीन कंपन्या आणि प्रतिष्ठाने स्वत:ला दिवाळखोर जाहीर करत आहेत. बँकांचे दिवाळे वाजताना दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.जनतेचा खिसा तर रिकामा झाला आहेच, पण सरकारी तिजोरीतही खडखडाटच दिसतो. त्यामुळेच युद्धकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील पावणेदोन लाख कोटी रुपये काढून घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. घरातले सोने मोडण्यासाठी आजवर जनताच सराफांकडे जात असे. पण आता तर देशातील रिझर्व्ह बँकही आपल्याकडील सोन्याचा साठा मोडायला निघाली आहे, असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट ठेवलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEconomyअर्थव्यवस्थाDiwaliदिवाळी