शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:54 IST

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत, असे पवार म्हणाले.

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसे राज्याराज्यांत वेगवेगळी राजकीय समीकरणे उदयास येऊ लागली आहेत. आंध्रमध्ये भाजपाची साथ तेथील स्थानिक पक्षाने सोडली आहे. तर इंडिया आघाडीतही अनेक छोटे पक्ष इशारे देत आहेत. जागावाटपावर अद्याप बोलणी सुरु व्हायची आहेत, अशातच दिल्लीत आप आणि काँग्रेसमधला तिढा सुटेल असे वाटत नसताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर संकेत दिले आहेत. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पवार यांनी हा दावा केला आहे. दिल्लीत काँग्रेसकडे सध्या एकही खासदार नाहीय. अशा परिस्थितीत केजरीवाल काँग्रेसला आघाडीम्हणून सातपैकी तीन जागा सोडण्यास तयार असल्याचे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे केजरीवालांनीच हे आपल्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ईडीच्या कारवाईमुळे इंडियाची आघाडी आणखी मजबूत होईल असेही पवार म्हणाले. 

जर तुम्ही सत्तेत आलात आणि अदानींसोबत दिसलात तर राहुल गांधी टीका करतील, असे कसे चालेल या प्रश्नावर पवारांनी हसत हसत तुम्ही पहालच की कसे काम होईल ते, असे उत्तर दिले. 

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत. ते एका पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचे विचार वेगळे असू शकतात, असे पवार म्हणाले. मी अदानींसोबत फित कापण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या अधिपत्याखाली मुंद्रा पोर्ट देशातील सर्वात मोठा पोर्ट बनला आहे. आपला देश तिथून आज बरेच काही आयात-निर्यात करतोय. मग त्यांच्यावर टीका का करावी? तुम्ही राहुल गांधींनाच हा प्रश्न विचारा असेही पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानी