शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'यामुळे' मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातून माजी कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:45 IST

मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाची स्थापना झाली असून शपथविधी पार पडला आहे. परंतु, नव्या सरकारमध्ये कृषीमंत्रालाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कृषीप्रधान देशातील सर्वात महत्त्वाचे असलेले कृषीमंत्रालय मोदींच्या पहिल्या कार्यकाळात राधामोहन सिंह यांच्याकडे होते. एवढं महत्त्वाचं मंत्रालय सांभाळणाऱ्या राधामोहन सिंह यांना यावेळी मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नाही.

मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याची कारणं देखील तशीच आहेत. राधामोहन सिंह बिहारमधून खासदार आहेत. परंतु, बिहार भाजपलाच राधामोहन सिंग मंत्री नको होते, असं सांगण्यात येत आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राधामोहन सिंह यांच्या मतदारसंघात अमित शाह यांनी सभा घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, तुमच्या खासदाराने काम केलं की नाही, हे न पाहता, मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे, या उद्देशाने उमेदवाराला निवडून द्या. त्याच दिवशी राधामोहन यांच्याविषयी अमित शाह यांचे काय मत आहे, हे निश्चित झाले होते. कृषीमंत्री असताना राधामोहन सिंह बिहारमध्ये अनेक योजना आणू शकत होते. परंतु, त्यांनी तस काहीही केलं नाही. तसेच जे काही थोडेफार प्रकल्प बिहारला नेले ते आपल्या मतदार संघापूरतेच ठेवले. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते त्यांच्यावर नाराज होते.

दुसरे कारण म्हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोतिहारीमध्ये सभा निश्चित करण्यात आली होती. परंतु, ती सभा रद्द करून चंपारणमध्ये घ्यावी लागली. २०१४ मध्ये राधामोहन सिंह यांच्या प्रचारासाठी आलेल्या मोदींनी घोषणा केली होती, की मोतिहारीमधील साखर कारखान्यातून उत्पादन सुरू होईल. मात्र कृषीमंत्री असताना देखील राधामोहन सिंह यांनी त्यासाठी हालचाल केली नाही. त्यामुळे मोदींनी मोतिहारीमध्ये सभा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्याचवेळी राधामोहन सिंह यांच्याविषयीचे मोदींचे मत बदलले होते.

दरम्यान मोतिहारीमध्ये साखर कारखान्याच्या हायवेलगतच्या जमिनीची विक्री करण्यात आली. यात भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचे चर्चा होती. त्यातच काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यातील कामगारांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे येथे मोठा असंतोष निर्माण झाला होता. तसेच राधामोहन सिंह यांचे वय आता ७० च्या पुढे गेले आहे. त्यामुळे देखील त्यांना मंत्रीमंडळातून डिच्चू मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.