शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

'यामुळे' मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातून माजी कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:45 IST

मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाची स्थापना झाली असून शपथविधी पार पडला आहे. परंतु, नव्या सरकारमध्ये कृषीमंत्रालाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कृषीप्रधान देशातील सर्वात महत्त्वाचे असलेले कृषीमंत्रालय मोदींच्या पहिल्या कार्यकाळात राधामोहन सिंह यांच्याकडे होते. एवढं महत्त्वाचं मंत्रालय सांभाळणाऱ्या राधामोहन सिंह यांना यावेळी मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नाही.

मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याची कारणं देखील तशीच आहेत. राधामोहन सिंह बिहारमधून खासदार आहेत. परंतु, बिहार भाजपलाच राधामोहन सिंग मंत्री नको होते, असं सांगण्यात येत आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राधामोहन सिंह यांच्या मतदारसंघात अमित शाह यांनी सभा घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, तुमच्या खासदाराने काम केलं की नाही, हे न पाहता, मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे, या उद्देशाने उमेदवाराला निवडून द्या. त्याच दिवशी राधामोहन यांच्याविषयी अमित शाह यांचे काय मत आहे, हे निश्चित झाले होते. कृषीमंत्री असताना राधामोहन सिंह बिहारमध्ये अनेक योजना आणू शकत होते. परंतु, त्यांनी तस काहीही केलं नाही. तसेच जे काही थोडेफार प्रकल्प बिहारला नेले ते आपल्या मतदार संघापूरतेच ठेवले. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते त्यांच्यावर नाराज होते.

दुसरे कारण म्हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोतिहारीमध्ये सभा निश्चित करण्यात आली होती. परंतु, ती सभा रद्द करून चंपारणमध्ये घ्यावी लागली. २०१४ मध्ये राधामोहन सिंह यांच्या प्रचारासाठी आलेल्या मोदींनी घोषणा केली होती, की मोतिहारीमधील साखर कारखान्यातून उत्पादन सुरू होईल. मात्र कृषीमंत्री असताना देखील राधामोहन सिंह यांनी त्यासाठी हालचाल केली नाही. त्यामुळे मोदींनी मोतिहारीमध्ये सभा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्याचवेळी राधामोहन सिंह यांच्याविषयीचे मोदींचे मत बदलले होते.

दरम्यान मोतिहारीमध्ये साखर कारखान्याच्या हायवेलगतच्या जमिनीची विक्री करण्यात आली. यात भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचे चर्चा होती. त्यातच काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यातील कामगारांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे येथे मोठा असंतोष निर्माण झाला होता. तसेच राधामोहन सिंह यांचे वय आता ७० च्या पुढे गेले आहे. त्यामुळे देखील त्यांना मंत्रीमंडळातून डिच्चू मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.