शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदी; राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला, म्हणाले, "पुन्हा असं झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:21 IST

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धबंदी का केली याची माहिती दिली आहे.

Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झालीय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात करत ऑपरेशन सिंदूर हे लष्कराच्या तिन्ही दलांचे एक अतुलनीय उदाहरण असल्याचे म्हटलं. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर देण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले नाही. पाकिस्तानने याचना केल्यानंतर युद्धबंदी करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपणच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचे म्हणत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धबंदी केल्याचे म्हटलं. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा चुकीची घटना घडली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु करणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

"६-७ मे च्या रात्री सैन्याने ऐतिहासिक ऑपरेशन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लोकांचा धर्म विचारून मारले गेले. त्यानंतर पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि निर्णायक कारवाईची परवानगी दिली. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. माता-भगिनींच्या सिंदूरचा बदला सैन्याने दहशतवाद्यांकडून घेतला. मी खूप काळजीपूर्वक बोलत आहे, या ऑपरेशनमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. मृतांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.

हे हल्ले आक्रमक स्वरूपाचे नव्हते. पाकिस्तानने लष्करी तळांवर हल्ला केला. आम्ही हे हल्ले हाणून पाडले. आमची कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती. ७ मे पासून १० मे च्या रात्री १:३० वाजेपर्यंत पाकिस्तानने हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला. त्यांचे लक्ष्य आमचे लष्करी तळ होते. आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आणि पाकिस्तान कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकला नाही. भारतीय सैन्याने शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावला, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"भारताने हे ऑपरेशन थांबवले कारण आम्ही ठरवलेले सर्व पूर्ण केले होते. भारताने दबावाखाली हे ऑपरेशन थांबवले असे म्हणणं पूर्णपणे चुकीचे आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा उद्देश वर्षानुवर्षे पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवाद्यांच्या नर्सरी नष्ट करणे हा होता. आमच्या सैन्याने फक्त त्यांनाच लक्ष्य केले जे या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन भारताला लक्ष्य करत होते. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणे नव्हता. १० मे रोजी सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने पराभव स्वीकारला. पाकिस्तानने आमच्या डीजीएमओनीं म्हटले की आता थांबा. ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवण्यात आले आहे. जर पाकिस्तानच्या बाजूने काही घडले तर ही ऑपरेशन पुन्हा सुरू होईल. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला आणि ऑपरेशन थांबवण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंमध्ये संवाद झाला आणि ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, १४० कोटी लोकांनी सैन्याचे शौर्य पाहिलं," असं राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तान