शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदी; राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला, म्हणाले, "पुन्हा असं झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:21 IST

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धबंदी का केली याची माहिती दिली आहे.

Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झालीय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात करत ऑपरेशन सिंदूर हे लष्कराच्या तिन्ही दलांचे एक अतुलनीय उदाहरण असल्याचे म्हटलं. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर देण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले नाही. पाकिस्तानने याचना केल्यानंतर युद्धबंदी करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपणच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचे म्हणत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धबंदी केल्याचे म्हटलं. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा चुकीची घटना घडली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु करणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

"६-७ मे च्या रात्री सैन्याने ऐतिहासिक ऑपरेशन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लोकांचा धर्म विचारून मारले गेले. त्यानंतर पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि निर्णायक कारवाईची परवानगी दिली. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. माता-भगिनींच्या सिंदूरचा बदला सैन्याने दहशतवाद्यांकडून घेतला. मी खूप काळजीपूर्वक बोलत आहे, या ऑपरेशनमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. मृतांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.

हे हल्ले आक्रमक स्वरूपाचे नव्हते. पाकिस्तानने लष्करी तळांवर हल्ला केला. आम्ही हे हल्ले हाणून पाडले. आमची कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती. ७ मे पासून १० मे च्या रात्री १:३० वाजेपर्यंत पाकिस्तानने हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला. त्यांचे लक्ष्य आमचे लष्करी तळ होते. आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आणि पाकिस्तान कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकला नाही. भारतीय सैन्याने शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावला, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"भारताने हे ऑपरेशन थांबवले कारण आम्ही ठरवलेले सर्व पूर्ण केले होते. भारताने दबावाखाली हे ऑपरेशन थांबवले असे म्हणणं पूर्णपणे चुकीचे आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा उद्देश वर्षानुवर्षे पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवाद्यांच्या नर्सरी नष्ट करणे हा होता. आमच्या सैन्याने फक्त त्यांनाच लक्ष्य केले जे या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन भारताला लक्ष्य करत होते. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणे नव्हता. १० मे रोजी सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने पराभव स्वीकारला. पाकिस्तानने आमच्या डीजीएमओनीं म्हटले की आता थांबा. ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवण्यात आले आहे. जर पाकिस्तानच्या बाजूने काही घडले तर ही ऑपरेशन पुन्हा सुरू होईल. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला आणि ऑपरेशन थांबवण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंमध्ये संवाद झाला आणि ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, १४० कोटी लोकांनी सैन्याचे शौर्य पाहिलं," असं राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तान