शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 23:26 IST

धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही निशाण्यावर घेतले. धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे.

उपराष्ट्रपती म्हणाले की, आज शेतकरी आंदोलन करत असतील, तर त्या आंदोलनाचे मर्यादित स्वरूपात मूल्यांकन करणे ही मोठी चूक ठरेल. रस्त्यावर न उतरणारे शेतकरीही आज चिंतित आणि व्यथित आहेत. भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न आठ पटीने वाढवावे लागेल. ते आठपट वाढवण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी कल्याणाचा आहे.

जगदीप धनखड यांनी शिवराज सिंहांना घेतलं निशाण्यावर - कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारत धनखड म्हणाले, "शेतकऱ्यांशी चर्चा का होत नाही, हे मला समजत नाही? मला हे समजत नाही की, आपण अर्थतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्याशी चर्चा करून, असा फॉर्म्युला का तयार करू शकत नाही, जो आपल्या शेतकऱ्यांना पुरस्कृत करू शकेल. अरे, आपण तर जे देय आहे, त्याबदल्यात बक्षीस नाही देत आहोत. आपण जे वचन दिले आहे, त्यात कंजुषपणा करत आहोत."

शिवराज सिंहांना सवाल -उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, "शेतकरी आपल्यासाठी आदरणीय आहेत, प्रातःस्मरणीय आहेत, सदैव वंदनीय आहेत. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला काय सहन करावे लागते, मला माहित आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद सर्वत्र पसरलेली आहे. देशभरात 180 हून अधिक संस्था आहेत, ज्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. शेती, शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पैलू स्पर्शिले गेले आहेत. शेतकऱ्याशी चर्चा करण्यास विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती का? हेही आपल्याला माहीत असायला हवे. पंतप्रधानांनी जगाला दिलेला संदेश हा आहे की, कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते, तर त्याचे काय झाले? गुंतागुंतीचे प्रश्न संवादातून सुटतात, असा संदेश पंतप्रधानांनी जगाला दिला आहे. कृषिमंत्री जी, आपल्या आधी जे कृषिमंत्री होते, त्यांनी लेखी स्वरुपात काही आश्वासन दिले होते? जर काही आश्वासन दिले असेल, तर त्याचेकाय झाले?"

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार