शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 23:26 IST

धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही निशाण्यावर घेतले. धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे.

उपराष्ट्रपती म्हणाले की, आज शेतकरी आंदोलन करत असतील, तर त्या आंदोलनाचे मर्यादित स्वरूपात मूल्यांकन करणे ही मोठी चूक ठरेल. रस्त्यावर न उतरणारे शेतकरीही आज चिंतित आणि व्यथित आहेत. भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न आठ पटीने वाढवावे लागेल. ते आठपट वाढवण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी कल्याणाचा आहे.

जगदीप धनखड यांनी शिवराज सिंहांना घेतलं निशाण्यावर - कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारत धनखड म्हणाले, "शेतकऱ्यांशी चर्चा का होत नाही, हे मला समजत नाही? मला हे समजत नाही की, आपण अर्थतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्याशी चर्चा करून, असा फॉर्म्युला का तयार करू शकत नाही, जो आपल्या शेतकऱ्यांना पुरस्कृत करू शकेल. अरे, आपण तर जे देय आहे, त्याबदल्यात बक्षीस नाही देत आहोत. आपण जे वचन दिले आहे, त्यात कंजुषपणा करत आहोत."

शिवराज सिंहांना सवाल -उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, "शेतकरी आपल्यासाठी आदरणीय आहेत, प्रातःस्मरणीय आहेत, सदैव वंदनीय आहेत. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला काय सहन करावे लागते, मला माहित आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद सर्वत्र पसरलेली आहे. देशभरात 180 हून अधिक संस्था आहेत, ज्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. शेती, शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पैलू स्पर्शिले गेले आहेत. शेतकऱ्याशी चर्चा करण्यास विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती का? हेही आपल्याला माहीत असायला हवे. पंतप्रधानांनी जगाला दिलेला संदेश हा आहे की, कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते, तर त्याचे काय झाले? गुंतागुंतीचे प्रश्न संवादातून सुटतात, असा संदेश पंतप्रधानांनी जगाला दिला आहे. कृषिमंत्री जी, आपल्या आधी जे कृषिमंत्री होते, त्यांनी लेखी स्वरुपात काही आश्वासन दिले होते? जर काही आश्वासन दिले असेल, तर त्याचेकाय झाले?"

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार