शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 23:26 IST

धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही निशाण्यावर घेतले. धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे.

उपराष्ट्रपती म्हणाले की, आज शेतकरी आंदोलन करत असतील, तर त्या आंदोलनाचे मर्यादित स्वरूपात मूल्यांकन करणे ही मोठी चूक ठरेल. रस्त्यावर न उतरणारे शेतकरीही आज चिंतित आणि व्यथित आहेत. भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न आठ पटीने वाढवावे लागेल. ते आठपट वाढवण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी कल्याणाचा आहे.

जगदीप धनखड यांनी शिवराज सिंहांना घेतलं निशाण्यावर - कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारत धनखड म्हणाले, "शेतकऱ्यांशी चर्चा का होत नाही, हे मला समजत नाही? मला हे समजत नाही की, आपण अर्थतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्याशी चर्चा करून, असा फॉर्म्युला का तयार करू शकत नाही, जो आपल्या शेतकऱ्यांना पुरस्कृत करू शकेल. अरे, आपण तर जे देय आहे, त्याबदल्यात बक्षीस नाही देत आहोत. आपण जे वचन दिले आहे, त्यात कंजुषपणा करत आहोत."

शिवराज सिंहांना सवाल -उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, "शेतकरी आपल्यासाठी आदरणीय आहेत, प्रातःस्मरणीय आहेत, सदैव वंदनीय आहेत. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला काय सहन करावे लागते, मला माहित आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद सर्वत्र पसरलेली आहे. देशभरात 180 हून अधिक संस्था आहेत, ज्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. शेती, शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पैलू स्पर्शिले गेले आहेत. शेतकऱ्याशी चर्चा करण्यास विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती का? हेही आपल्याला माहीत असायला हवे. पंतप्रधानांनी जगाला दिलेला संदेश हा आहे की, कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते, तर त्याचे काय झाले? गुंतागुंतीचे प्रश्न संवादातून सुटतात, असा संदेश पंतप्रधानांनी जगाला दिला आहे. कृषिमंत्री जी, आपल्या आधी जे कृषिमंत्री होते, त्यांनी लेखी स्वरुपात काही आश्वासन दिले होते? जर काही आश्वासन दिले असेल, तर त्याचेकाय झाले?"

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार