शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'भारत माता की जय' घोषणेची मनमोहन सिंग यांना अडचण का ? मोदींचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:48 IST

या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' या घोषणेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. मनमोहन सिंग यांना या घोषणेवर अडचण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलत होते. देशात काही राजकीय पक्ष असे आहेत की जे स्वत: चा फायदा देशापेक्षा अधिक महत्त्वाचा मानत असल्याचा दावा मोदींनी यावेळी केला. 

गेल्या महिन्यात मनमोहन सिंग यांनी भारत माता की जय या घोषणेचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले होते. त्यावर मोदींनी विचारले की, भारत माता की जय या घोषणेत वावगं काय आहे. पुढे मोदी म्हणाले की, देश सर्वोच्च आहे. विकास करणे भाजपचा मंत्र असून त्यासाठी शांतता आणि सद्भावना आवश्यक आहे.

या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला. 

राष्ट्रवाद व ‘भारत माता की जय’ या घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व विचार यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.