शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 08:47 IST

केंद्राला चौकशीची भीती का?, राहुल गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली : ‘अदानी समूहात जनतेचा पैसा का गुंतवला जात आहे आणि सरकार चौकशी करण्यास का घाबरत आहे,’ असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला आहे. दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी निषेध करण्यात आला. अनेक राज्यांत विधानसभांतही या प्रश्नावरून गदारोळ झाला. 

राहुल गांधी यांनी ट्विट केले, एलआयसीचे भांडवल अदानींकडे! एसबीआयचे भांडवल अदानींकडे! ईपीएफओचे भांडवलही अदानींकडे! ‘मोदानी’ने पर्दाफाश करूनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? पंतप्रधानजी चौकशी नाही, उत्तर नाही! एवढी भीती कशाची?”. यानंतर भाजपनेही काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविल्याच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्ष देशभरात रस्त्यावर उतरले. देशात प्रत्येक राज्यात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला होता.

भाजपमध्ये नव्याने सहभागी झालेले पुरी हे आपली निष्ठा दाखवण्यासाठी प्रक्षोभक विधाने करतात. अशी विधाने त्याचे स्वतःचे चरित्र कसे आहे ते दाखवतात.     - जयराम रमेश, काँग्रेस

स्वप्नातही सावरकर होऊ शकत नाही...

राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रखर टीका केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘तुम्ही स्वप्नातही कधीच सावरकर होऊ शकत नाही. कारण सावरकर होण्यासाठी दृढनिश्चय, भारतावर प्रेम, नि:स्वार्थीपणा आणि वचनबद्धता लागते. ठाकूर यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अभिमानामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाची भगवान रामाच्या कुळाशी तुलना केल्याची टीकाही केली.

काँग्रेस-ठाकरे गटात तणाव वाढला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना आवर घालण्यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईपर्यंत सहकार्य करायचे नाही, असे उद्धव ठाकरे गटाने ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोजित केलेल्या सोमवारी सायंकाळच्या भोजनापाठोपाठ विरोधी पक्षांच्या मंगळवारी सकाळी संसद भवनात होणाऱ्या बैठकीतही सहभागी होणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही गांधी आहात हे ठीक आहे, पण तुम्ही सावरकर नाही हे सांगायची गरज नाही. सावरकर हा महाराष्ट्रातील संवेदनशील विषय आहे. त्यांच्यावर टीका करून तुम्ही कारण नसताना भाजपच्या हाती हत्यार देत आहात, असे आम्ही काँग्रेसला वारंवार बजावत आहोत,’ असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस