शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 08:47 IST

केंद्राला चौकशीची भीती का?, राहुल गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली : ‘अदानी समूहात जनतेचा पैसा का गुंतवला जात आहे आणि सरकार चौकशी करण्यास का घाबरत आहे,’ असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला आहे. दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी निषेध करण्यात आला. अनेक राज्यांत विधानसभांतही या प्रश्नावरून गदारोळ झाला. 

राहुल गांधी यांनी ट्विट केले, एलआयसीचे भांडवल अदानींकडे! एसबीआयचे भांडवल अदानींकडे! ईपीएफओचे भांडवलही अदानींकडे! ‘मोदानी’ने पर्दाफाश करूनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? पंतप्रधानजी चौकशी नाही, उत्तर नाही! एवढी भीती कशाची?”. यानंतर भाजपनेही काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविल्याच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्ष देशभरात रस्त्यावर उतरले. देशात प्रत्येक राज्यात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला होता.

भाजपमध्ये नव्याने सहभागी झालेले पुरी हे आपली निष्ठा दाखवण्यासाठी प्रक्षोभक विधाने करतात. अशी विधाने त्याचे स्वतःचे चरित्र कसे आहे ते दाखवतात.     - जयराम रमेश, काँग्रेस

स्वप्नातही सावरकर होऊ शकत नाही...

राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रखर टीका केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘तुम्ही स्वप्नातही कधीच सावरकर होऊ शकत नाही. कारण सावरकर होण्यासाठी दृढनिश्चय, भारतावर प्रेम, नि:स्वार्थीपणा आणि वचनबद्धता लागते. ठाकूर यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अभिमानामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाची भगवान रामाच्या कुळाशी तुलना केल्याची टीकाही केली.

काँग्रेस-ठाकरे गटात तणाव वाढला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना आवर घालण्यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईपर्यंत सहकार्य करायचे नाही, असे उद्धव ठाकरे गटाने ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोजित केलेल्या सोमवारी सायंकाळच्या भोजनापाठोपाठ विरोधी पक्षांच्या मंगळवारी सकाळी संसद भवनात होणाऱ्या बैठकीतही सहभागी होणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही गांधी आहात हे ठीक आहे, पण तुम्ही सावरकर नाही हे सांगायची गरज नाही. सावरकर हा महाराष्ट्रातील संवेदनशील विषय आहे. त्यांच्यावर टीका करून तुम्ही कारण नसताना भाजपच्या हाती हत्यार देत आहात, असे आम्ही काँग्रेसला वारंवार बजावत आहोत,’ असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस