शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

का वाढणार नाही गरिबी? तुम्हीच सांगा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 12:15 IST

गरिबी हटवण्यावर कोणताही राजकीय पक्ष भर देताना दिसत नाही, कुठेही त्याबद्दल आवाज उठवला जात नाही, हेच 'दारिद्र्य' आपण किमान बौद्धिक पातळीवर तरी शाबूत ठेवलं आहे.

पवन देशपांडे, सहाय्यक संपादक, लोकमत

पैशांच्या मागे पैसा धावला अन् श्रीमंत आणखी श्रीमंत झाले. गरिबांच्या बाबतीतही तेच झाले. गरिबांच्या मागे गरिबीचे शुक्लकाष्ट कायम राहिले अन् ते आणखी गरीब झाले. नुकत्याच एका अहवालात हेच चित्र नव्याने अधोरेखित झाले. अब्जाधिशांची संख्या झपाट्याने वाढली. दुसरीकडे ८४ टक्के लोकांचे उत्पन्न घटले. ही स्थिती निर्माण होण्याला केवळ कोरोना आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे नाही. सरकारपासून अनेक घटकही यास कारणीभूत आहेत.

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात गरीब आणि श्रीमंत अशा दोन गटांत विखुरलेले चित्र आजही लख्ख कायम आहे. साधं उदाहरण म्हणजे, ५५ कोटी भारतीयांकडे असलेल्या एकूण संपत्तीएवढी संपत्ती केवळ ९८ भारतीय अब्जाधीशांकडे आहे. कोरोना काळात आपल्याला ही दरी आणखी वाढताना दिसत आहे. हाताला काम नसणाऱ्यांची संख्या अंदाजापेक्षाही दुपटीने वाढली आहे. एकीकडे भारतीय अब्जाधिशांची संपत्ती २३ लाख कोटींनी वाढली आहे तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ४.६ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले आहेत. जगातील धनकुबेरांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानी आहे आणि जगात २०२० मध्ये गरीब झालेल्या एकूण लोकांपैकी अर्धे भारतातील आहेत.

गरिबी हटावच्या मोहिमेला सातत्याने केवळ व्होट बँकेचे स्वरूप राहिले आहे आणि ते आजतागायत तसेच आहे. 'गरिबी हटाव' हा नारा इतका घिसापिटा झाला आहे की या नाऱ्यावर आता कोणतीही निवडणूक लढवली जात नाही. मुळात हा नारा दिला की मतदार आपल्याला मतदान करतच नाहीत, असा प्रत्यय जणू राजकीय पक्षांना आलेला असावा. त्यामुळे गरिबी हटवण्यावर कोणताही राजकीय पक्ष भर देताना दिसत नाही, कुठेही त्याबद्दल आवाज उठवला जात नाही, हेच 'दारिद्र्य' आपण किमान बौद्धिक पातळीवर तरी शाबूत ठेवलं आहे.

सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांची मारामार आहे. या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी खर्चाची तजविज आपल्यासाऱख्या इतर देशांच्या तुलनेने अर्धी आहे. रोजचे किमान वेतन आपल्याकडे २०१९ पर्यंत १७६ रुपये होते. सतपती आयोगाने २०१९ मध्ये यात वाढ करून ३७५ रुपये करण्याची शिफारस केली होती. प्रत्यक्षात त्यात वाढ झाली ती २ रुपयांची. म्हणजे १७६ रुपये वेतनावरून २०२० मध्ये किमान वेतन झाले १७८ रुपये. महागाई मात्र कैक पट वाढते आहे. कमाईपोटी खिशात येणारा पैसा आणि लागणारा खर्च यात तफावत निर्माण होत राहणार तर गरिबी वाढणार... हे सांगण्यासाठी कोणत्याही अर्थसल्लागार, अर्थतज्ज्ञाची गरजच नाही.

२०२० मध्ये आत्महत्या केलेल्या एकूण लोकांमध्ये रोजंदारीवर काम करत असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर स्वयंरोजगार करणारे आणि बेरोजगार असणाऱ्यांची संख्या होती.

कोणत्या पातळीवर आपण चुकत आहोत?

गेल्या तीन वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून देशाच्या तिजोरीत ८.०२ लाख कोटी रुपयांची भर पडली. गेल्या एकाच वर्षात त्यातील ३.७१ लाख कोटी जमा झाले. यातील ९९ टक्के रक्कम थेट सामान्यांच्या खिशातून वसूल झाली. पेट्रोल-डिझेल महागल्याने इतर सेवा-वस्तू महागल्या. ती झळ बसली ते वेगळेच. म्हणजेच... दोन्ही बाजूने खिसा रिकामा होणार तो सामान्यांचाच... गरिबी का वाढणार नाही?

देशातील ९८ धनकुबेर कुटुंब भरत असलेल्या एकूण करापैकी चार टक्के कर आपल्या देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे दोन वर्षाचे बजेट पूर्ण होऊ शकते. एवढेच काय या चार टक्क्यांमध्ये देशातील माध्यान्ह भोजन योजना सतरा वर्षे चालू शकेल किंवा सहा वर्षे सर्व शिक्षा अभियान चालू शकेल. या ९८ धनकुबेर कुटुंबांच्या एक टक्का टॅक्समधून केंद्रीय शिक्षण विभागाला वर्षभर लागणारा निधी मिळू शकेल. 

टॅग्स :Indiaभारत