शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता?, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 11:42 IST

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक चांगलीच कंबर कसून हर तऱ्हेची मेहनत घेताना दिसत आहेत. पण सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्दे30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यांना कशाला राजकारणात खेचता-मोदीकाँग्रेस नेत्यांना राहुल गांधींकडून प्रोत्साहन, मोदींची नाव न घेता टीकापंतप्रधान होईपर्यंत मोदींच्या वडिलांचं नावही माहीत नव्हतं - मुत्तेमवार

नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक चांगलीच कंबर कसून हर तऱ्हेची मेहनत घेताना दिसत आहेत. प्रचारसभांचाही जोरदार धडाका राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि सी.पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आईवरुन टीप्पणी केली होती. ''रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय'', असं विधान राज बब्बर यांनी केले होते.  हे प्रकरण ताजं असतानाच शनिवारी विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं. 

(माझ्या आईला राजकारणात का खेचता होss? मोदींचा काँग्रेसवर 'इमोशनल अटॅक')

मुत्तेमवारांचे वादग्रस्त विधाननरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणीही ओळख नव्हते. त्यांच्या वडिलांचे नावही कोणाला ठाऊक नव्हते, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी, इंदिरा यांचे वडील पं.जवाहरलाल नेहरू यांची नावे देशातील प्रत्येकाला माहिती आहेत, असंही ते म्हणाले. राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. 

पंतप्रधान मोदींचा पलटवारनिवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेत्यांकडून आपल्या कुटुंबीयांना वारंवार लक्ष्य केले जात असल्यानं पंतप्रधान मोदींनी रविवारी जोरदार हल्लाबोल चढवला. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथे जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 

'मी कोणाच्याही परिवारासंदर्भात वैयक्तिक स्वरुपातील कोणतेही टीका-टीप्पणी करत नाही. जर माझे आई-वडील राजकारणात असते तर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार होता. माझ्या वडिलांचं 30 वर्षांपूर्वी निधन झाले. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकारणात खेचण्याचं कारण काय?', असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला आहे. 

या प्रकारास राहुल गांधींकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.  ''काँग्रेसमध्ये असे कोणी आहेत का जे नामदाराच्या (राहुल गांधी) परवानगीशिवाय बोलतात?. नामदार म्हणतात की मोदी माझ्या कुटुंबीयांबद्दलही बोलू शकतात. पण मी केवळ तुमच्या पक्षातील माजी पंतप्रधान-नेतेमंडळी आणि त्यांनी केलेल्या कामासंदर्भात बोलत आहे'', असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018