शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता?, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 11:42 IST

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक चांगलीच कंबर कसून हर तऱ्हेची मेहनत घेताना दिसत आहेत. पण सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्दे30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यांना कशाला राजकारणात खेचता-मोदीकाँग्रेस नेत्यांना राहुल गांधींकडून प्रोत्साहन, मोदींची नाव न घेता टीकापंतप्रधान होईपर्यंत मोदींच्या वडिलांचं नावही माहीत नव्हतं - मुत्तेमवार

नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक चांगलीच कंबर कसून हर तऱ्हेची मेहनत घेताना दिसत आहेत. प्रचारसभांचाही जोरदार धडाका राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि सी.पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आईवरुन टीप्पणी केली होती. ''रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय'', असं विधान राज बब्बर यांनी केले होते.  हे प्रकरण ताजं असतानाच शनिवारी विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं. 

(माझ्या आईला राजकारणात का खेचता होss? मोदींचा काँग्रेसवर 'इमोशनल अटॅक')

मुत्तेमवारांचे वादग्रस्त विधाननरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणीही ओळख नव्हते. त्यांच्या वडिलांचे नावही कोणाला ठाऊक नव्हते, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी, इंदिरा यांचे वडील पं.जवाहरलाल नेहरू यांची नावे देशातील प्रत्येकाला माहिती आहेत, असंही ते म्हणाले. राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. 

पंतप्रधान मोदींचा पलटवारनिवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेत्यांकडून आपल्या कुटुंबीयांना वारंवार लक्ष्य केले जात असल्यानं पंतप्रधान मोदींनी रविवारी जोरदार हल्लाबोल चढवला. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथे जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 

'मी कोणाच्याही परिवारासंदर्भात वैयक्तिक स्वरुपातील कोणतेही टीका-टीप्पणी करत नाही. जर माझे आई-वडील राजकारणात असते तर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार होता. माझ्या वडिलांचं 30 वर्षांपूर्वी निधन झाले. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकारणात खेचण्याचं कारण काय?', असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला आहे. 

या प्रकारास राहुल गांधींकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.  ''काँग्रेसमध्ये असे कोणी आहेत का जे नामदाराच्या (राहुल गांधी) परवानगीशिवाय बोलतात?. नामदार म्हणतात की मोदी माझ्या कुटुंबीयांबद्दलही बोलू शकतात. पण मी केवळ तुमच्या पक्षातील माजी पंतप्रधान-नेतेमंडळी आणि त्यांनी केलेल्या कामासंदर्भात बोलत आहे'', असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018